अभिनेत्री एली अवराम हिने भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एली मूळची स्वीडनची आहे. ती अत्यंत कमी वयात भारतात आली होती. माझा संघर्ष आता यशस्वी होताना दिसून येत आहे. मी कमी वयातच भारतात येऊन कारकीर्द घडविण्याचा मोठा निर्णय घेतला होता. आता माझ्या या निर्णयावर गर्व वाटत असल्याचे एलीने म्हटले आहे.
माझ्या या निर्णयामुळे माझी एक व्यक्ती म्हणून जडणघडण झाली आहे. विविध स्थितींना सामोरे जाण्याची योग्यता माझ्यात निर्माण झाली आहे. जीवनाबद्दलची माझी समजूत बदलली आहे. भारतात बरेच काही शिकता आले असून याकरता मी आभारी आहे. स्वतःच्या कारकीर्दीतील संघर्षामुळे हे सारे शिकता आले असल्याचे ती सांगते.
केवळ दिग्दर्शकच माझ्यावर विश्वास दाखवत नसून भारतातील प्रेक्षकांचे प्रेमही प्राप्त होत आहे. लोकांचे प्रेम मिळाले नसते तर इथपर्यंत पोहोचता आले नसते असे तिने म्हटले आहे. एली अवराम काही काळापूर्वी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानसाब्sात हरफनमौलामध्ये दिसून आली होती. अभिनेत्री यात मिस्टर परफेक्शनिस्टसोबत प्रभावी नृत्य केले होते.
एली अवरामने 2013 मध्ये मिक्की व्हायरस या चित्रपटातून पदार्पण करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर तिने उंगली, नाम शबाना, पोस्टर बॉयज, बाजार, जबरिया जोडी, फ्रॉड सइयां आणि मलंग यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.