प्रतिनिधी / सातारा :
केंद्र शासनातर्फे अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत, पण या योजनांचा फायदा मात्र शेतकऱयांना मिळत नाही. शेतकऱयांना त्याच्या शेतीमालाला बाजार भावाप्रमाणे रक्कम मिळत नाही. सर्वत्र काळा बाजार चालला असल्याने महागाईने सध्या उच्चांग गाठला आहे, याविरोधात भारतीय किसान संघातर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे धरण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र पवार, सुरेश फाळके, बाळकृष्ण फाळके, सुदाम पवार, संजय फाळके, तानाजी घाडगे, संजय फाळके, शिशीर शहा, शशिकांत फाळके, रमेशचंद्र गजधरणे, विजय गाडवे आदी उपस्थित होत