वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. उभय संघामध्ये वनडे व टी-20 मालिका खेळविली जाणार असून या मालिकेच्या आयोजनाची संधी बेंगळूरला मिळाली आहे.
उभय संघातील ही वनडे मालिका भरविण्यास केरळ क्रिकेट संघटना असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. थिरूवनंतपूरम् येथे या मालिका दरम्यान ग्रीन फिल्ड क्रीडास्पर्धा होत असल्याने केरळने सदर स्पर्धेतील सामने आपण भरवू शकत नसल्याचे कळविले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळविले जाणार असून मार्चच्या पहिल्या आठवडय़ात या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी केरळने नकार दिल्याने बेंगळूरला ही संधी बीसीसीआयने दिली आहे.