बेंगळूर/प्रतिनिधी
संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदच्या आवाहनाला पाठिंबा जाहीर करत बेंगळूरमधील नागरिकांनी शुक्रवारी २६ मार्च रोजी शहरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याची घोषणा केली आहे.
“एसकेएमच्या वतीने राज्यविरोधी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. कृषीविरोधी कायद्यांच्या विरोधात सकाळी १० वाजता हा टाउन हॉल येथून या अंत्ययात्रेस प्रारंभ होणार आहे,” असे आयोजन समितीने एका निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी सोमवारी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि कर्नाटकातील शेतकरी नेते कोदीहळ्ळी चंद्रशेखर यांनी शेतकऱ्यांना केंद्राविरोधात बेंगळूरमध्ये निषेध तीव्र करण्याचे आवाहन केले.