उद्धव भगवंतांना म्हणाला, लोकांना संसाररूप सर्पाने ग्रासलेले आहे, म्हणून ते आत्मसुखाला विसरून विषयसुखाला भुलले आहेत. खरोखर श्रीकृष्णा ! अशा दीन जनांचा आपण कृपा करून उद्धार करावा. असे म्हणून त्याने श्रीकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेविले आणि त्याची प्रार्थना केली. ही भक्ताची विनंती ऐकून भक्तांचे प्रभु श्रीकृष्ण प्रसन्न झाले. त्यांना दिन जनांचा उद्धार करण्याबाबत पूर्वी होऊन गेलेल्या एका सभेची आठवण झाली. त्यातील उद्बोधक, महितीयुक्त चर्चा त्यांना आठवली ती उद्धवाच्या प्रश्नाच्या उत्तराशी संबंधित असल्याने त्या चर्चेबाबत उद्धवाला सांगावे असे त्यांच्या मनात आले. त्या सभेला मुख्यत्वेकरून श्रीकृष्ण, देवर्षि व ब्रह्मर्षि आणि तपोराशि व ज्ञाननिधी असे राजर्षिही जमले होते.
श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, तू जसे मला विचारलेस तसेच एकदा अजातशत्रू युधि÷िराने दीन जनांचा उद्धार करण्याबाबत धार्मिकशिरोमणी भीष्मांना विचारले होते. त्यावेळी भीष्माचार्य शरपंजरी पडून त्यांच्या अंतसमयाची प्रतीक्षा करत होते. प्रश्न विचारणारा धर्मही भीष्माचार्यांइतकाच थोर होता. त्याची थोरवी सांगतो ऐक. धर्माला संसारामध्ये शत्रु म्हणून नव्हताच.
तो निश्चयात्मक व सत्य बोलणारा होता. ऋषीच्या मंत्राने त्याचा जन्म झालेला होता. भीष्मही काही कमी नव्हते भीष्म दृढनिश्चयाचे असून मोठे धार्मिक, स्वधर्माच्या नियमाने व्रतस्थ राहणारे, यावज्जन्म ब्रह्मचर्याने राहिलेले आणि मोठमोठय़ा योद्धय़ांनाही वंद्य होते.
गुरुत्वाची मर्यादा भंग न करिता त्यांनी परशुरामाशी युद्ध केले. ब्रह्मचर्यव्रतपालन करण्यासाठी काशीराजाच्या मुलीचा त्याने अंगीकार केला नाही. धनुर्विद्येमध्ये परशुराम हे त्यांचे गुरु होते. भीष्मांनी त्याना पण करून रणांगणामध्ये जिंकले तेव्हा त्यानी अत्यंत संतुष्ट होऊन आपल्या नावाचे बिरुद भीष्माच्या पायात घातले इतकेच नव्हे, तर आणखी प्रसन्न झाले व म्हणाले की, भीष्मा ! तुला कामाची बाधा कधीच व्हावयाची नाही. असा वर देतो. भीष्माबद्दल आणखीन सांगायचे म्हणजे त्याने आपल्या बापाचा संतोष वाटावा, म्हणून आपले तारुण्य दिले, आणि आपण वार्धक्मय घेऊन त्याला सुखी केले. तेव्हा पित्यानेही त्याला आशीर्वाद दिला की , “हे बुद्धिमान् भीष्मा ! ऐक. वार्धक्मयामध्ये शक्ती क्षीण होऊन येणारी आपत्ती तुला कधीही बाधावयाची नाही. ह्यामुळे जो जो अधिक अधिक म्हातारपण येऊ लागले, तो तो त्याचा प्रताप वाढतच गेला. काळाची शक्तीच खुंटली. त्याच्याने भीष्माला क्षीण करवेना. म्हणून त्याने आपल्या पायामध्ये काळ, काम आणि परशुराम या तिघांचीही बिरुदे बांधली होती. ‘धर्मनि÷ांमध्ये श्रे÷’ असा तो होता. म्हणून भीष्माला धर्मभृतांवर हेच नाव शोभत होते. ज्याच्या प्रतिज्ञेच्या निर्धाराने मलाही हार खायला लावली व निःशस्त्राला शस्त्रधारी केले. एवढी ज्याच्या प्रतिज्ञेची योग्यता! भजनमर्यादा न मोडता मला युद्धात हार मान्य करायला लावून तो माझ्या पायी लागला. नंतर निर्वाणीची शपथ वाहून त्याने शस्त्रास्त्रे दूर टाकून दिली व मर्माच्या ठिकाणी शत्रूचे बाण लागले तरी हातात शस्त्र म्हणून धरलेच नाही. बाणांनी मर्मस्थान फोडल्यामुळे अत्यंत व्याकुळता आली असे पाहून भीष्माने निश्चय केला आणि देहत्यागाला तो सिद्ध झाला. परंतु हे अति घोर दक्षिणायन आहे असे ऐकून, काळाला दूर सारून आपल्या शरीराचे रक्षण केले आणि मग आपल्या दृढ निश्चयाप्रमाणे त्याने शरपंजरावर शयन केले असता मोठमोठय़ा ऋषिसमुदायाच्या परिवारात धर्मराजाने त्यास प्रश्न केला. आमच्या सर्वांच्या समक्ष युधि÷िराने विचारली, तीच पुरातन कथा मी तुला सांगतो.
भारतीय युद्ध संपल्यावर धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहाराने शोकविह्वळ झाला होता तेव्हा त्याने भीष्मांकडून धर्माचे पुष्कळ विवरण ऐकल्यानंतर, मोक्षाच्या साधनांसंबंधी प्रश्न विचारला होता. हा प्रश्न विचारायचे प्रमुख कारण म्हणजे, देहबुद्धी वाढल्यामुळे, भारतीय महायुद्धात जो नरसंहार झाला त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्याला वाटू लागले होते.
क्रमशः