प्रतिनिधी/ वैभववाडी
सिंधुदुर्ग जिह्यातील शेवटच्या घटकातील शेतकऱयांच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतीविषयक विकासाला शाश्वत दिशा देण्यासाठी भैरीभवानी प्रति÷ानच्यावतीने बळीराजा आत्मसन्मान योजना सुरू करत असल्याची माहिती भैरीभवानी प्रति÷ानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक दुर्बल घटकासाठी ही प्राधान्यक्रम योजना असून प्रत्येक शेतकऱयाला मोफत दहा काजू कलमे दिली जाणार आहेत. 9 जुलै रोजी या योजनेचा शुभारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रावराणे यांच्या आचिर्णे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान माजी सभापती लक्ष्मण रावराणे, संदेश पटेल, पं. स. सदस्य मंगेश लोके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम आदी उपस्थित होते.
रावराणे म्हणाले, जिह्यात जवळपास 90 टक्के लोक शेती व्यवसाय करणारे आहेत. या शेतकऱयांचा उदरनिर्वाह या शेतीवर अवलंबून आहे. मात्र, यातील 60 ते 70 टक्के शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे या शेतकऱयांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. अशा शेतकऱयांना वार्षिक ठोस उत्पन्नाचा स्त्राsत मिळावा, यासाठी या शेतकऱयांना प्रत्येकी दहा काजू कलमे दिली जाणार आहेत. या काजू कलमांच्या संगोपनाकरिता वर्षभर लागणारी खते, त्याचबरोबर अन्य कीटकनाशके व अन्य औषधे यांचाही मोफत पुरवठा केला जाणार आहे. काजू लागवडीपासून तीन वर्षापर्यंत प्रतिवषी भैरीभवानी प्रति÷ानच्या माध्यमातून या काजू कलमांच्या संगोपनाचा खर्च केला जाणार आहे. यामुळे शेतकऱयांना उत्तेजन मिळेल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱयांना वार्षिक 40 हजाराचे उत्पन्न
शेतकऱयांचे काजू उत्पादन वाढावे, यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. काजू रोपांचे योग्य जतन केल्यास व निगा राखल्यास दहा काजू झाडांपासून तीन वर्षानंतर तीनशे किलो उत्पन्न येथील शेतकऱयांना मिळणार आहे. त्यातून वर्षाला 30 ते 40 हजार रुपये उत्पन्न मिळेल, असा विश्वास रावराणे यांनी व्यक्त केला.
शेतकऱयांना बाजारभाव मिळवून देणार
या काजू पिकांतर्गत हळद, शेवगा इत्यादी आंतरपिकेही शेतकरी घेऊ शकणार आहेत. या योजनेमुळे येथील शेतकऱयांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. उत्पादित काजू बियांच्या विक्रीसाठी शेतकऱयांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या शेतकऱयांना बाजारभाव मिळत नाही. तो मिळवून देण्याची हमी प्रति÷ानच्या माध्यमातून दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रतिष्ठानकडे बाराशे शेतकऱयांची नोंदणी
या योजनेतील सहभागी शेतकऱयांकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. यापुढे जिह्यातील शेतकऱयांकडून जशी मागणी होईल, तशी काजू कलमे पुरविली जाणार आहेत. चालू हंगामात जिह्यातील शेतकऱयांना 50 हजार काजू कलमे मोफत दिली जाणार आहेत. दहा हजार कलमे प्रति÷ानच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली आहेत. सध्या शासकीय नर्सरीमध्ये काजू कलमे उपलब्ध नसल्याने खासगी नर्सरीधारकांकडून ही काजू कलमे उपलब्ध करून दिली आहेत. आजवर प्रति÷ानकडे बाराशे शेतकऱयांनी आपले फॉर्म भरून दिले आहेत, अशी माहिती रावराणे यांनी दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या काजूची ‘कोकण’ नावाने विक्री
जिह्यात काजू क्रांती घडविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे रावराणे यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतून काजू कोकणात येत आहे आणि तो कोकण काजू म्हणून विकला जात आहे. मुळात कोकणच्या काजू गरामध्ये न्यूट्रीशन जास्त आहे. बाहेरून आलेल्या काजूची तुलना कोकणातील काजूशी होऊ शकत नाही. मात्र, कोकणच्या नावावर बाहेरचा काजू विकला जात आहे, असे होऊ नये. यासाठी शेतकऱयांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतीपुरक व्यवसायाला चालना देणार
पुढील वषीच्या कृषी दिनापूर्वी 50 हजार काजू कलम लागवडीचे टार्गेट आपण पूर्ण करणार आहोत. ऍग्रो टुरिझमला चालना देणार असून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार व पर्यटन व्यवसाय कसे आणता येतील, यासाठीही आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भैरीभवानी प्रति÷ानच्यावतीने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे रावराणे यांनी स्पष्ट केले.