बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात तीन दिवसांत मंदिरांमधील सर्व सेवा पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा हिंदू धार्मिक संघटना, स्थायी व मागासवर्गीय कल्याण विभाग राज्यमंत्री कोटा श्रीनिवास पूजारी यांनी केली आहे. “राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस मंदिरे व प्रसाद (भोजनामध्ये सर्व सेवा) पुन्हा सुरू केल्या जातील,” असे मंत्री कोटा श्रीनिवास पूजारी म्हणाले.
दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून तीर्थयात्रेसाठी बंद राहिल्यानंतर धार्मिक स्थळांना ५ जुलैपासून केवळ दर्शनासाठी उघडण्याची परवानगी होती.