ऑनलाइन टीम ठाणे
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. खडवली-टिटवाळा स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कसारा-कल्याण दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे.
मध्य रेल्वेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत दुरुस्ती करण्यात आली. सकाळी 935 वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, लोकलवर सुरक्षितेच्या कारणास्तव वेगमर्यादा घालून देण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीतच आहे.
या मार्गावरून जाणाऱया लोकलवर ताशी 30 किमी इतक्या वेगाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत. ऐन सकाळीच मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे सकाळी ऑफिस, कॉलेजसाठी जाणाऱया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.