प्रतिनिधी/ पणजी
पणजी महानगर पालीकेच्या कालच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आले. यावेळी गेल्या अनेक वर्षापासून असलेला मार्केटचा विषय चर्चेत आला यावेळी मार्केटवर मनपाचा अधिकार असावा तसेच दुकानदारांनी भाडे करार करावा या मागणीसाठी नगसेवकांनी महापौर उदय मडकईकर व आयुक्त संजित रॉड्रिग्ज यांना धारेवर धरले यावेळी मार्केट विषयावर 5 फेब्रुवारी रोजी खास बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन महापौर उदय मडकईकर यांनी नगरसेवकांना दिले.
गेल्या अनेक वर्षापासून पणजी मार्केटचा विषय मनपामध्ये गाजत आहे. मार्केट टेनन्ट असोसिएशन मनपाला विश्वासात न घेता आपल्याला हवे तसे निर्णय घेत असल्याने मनपा नगरसेवकांनी राग व्यक्त केला पणजी मार्केटवर मनपाचे अधिकार असायला हवे तसेच दुकानदारांनी भाडे करार मनपाकडे करावा. याच्यावर महापौरांनी नजर ठेऊन त्यांना आदेश देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.
शहरातील खोदकाम केलेले रस्ते व्यवस्थित करण्याची मागणी
पणजीत सध्या विविध पाईपलाईनसाठी सर्वत्र खोदून ठेवल्याने नगरसेवकांनी महापौराना धरेवर धरले. हे कंत्राटदार रस्ते खोदतात पण तो व्यवस्थित माती भरत नसल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास होतो. त्यांना खोदण्याची परवानगी देताना रस्ते व्यवस्थित करण्याचे आदेश द्यावे. सध्या पणजीत सर्वत्र रस्ते खोदून ठेवले आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. पणजीत सर्व प्रभागामध्ये गॅसपाईपाईनसाठी तसेच भुमिगत विद्यूत वाहिन व पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदले जात आहे. पणजीतील 9 रस्ते हॉटमिक्स होत असल्याने रस्त्यावर खोदकाम सुरु आहे. डांबरीकरण झाल्यावर रस्ते खोदायला मनपा परवानगी देणार नाही. तसेच त्यांच्याकडून व्यवस्थित रस्ते बूजून घेतले जाणार आहे. वाहनचाकाला तसेच लोकांना काहीच त्रास दिला तर त्यांच्यावर कारवाई केले जाणार, असे यावेळी आयुक्त संजित रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
मिरामार किनारी बेकायदेशीर बोटींग बंद
मिरामार किनाऱयावर ज्या बोटीवर कारवाई केली आहे त्या पुन्हा सुरु करण्यास दिले जाणार नाही. या ठिकाणी घाणीचे साम्राज झाले आहे. हे बोटीगवाले पर्यटकांना तिथेच खायला देतात त्यामुळे सर्वत्र घाण पसरते एखाद्यावेळी कोणताही अपघात झाल तर याला जबाबदार कोण त्यामुळे आम्ही या बेकायदेशीर बोटी येथे चालावयाला देणार नाही. यासाठी कप्तान बंदर खाते व पर्यटन खात्याला निवेदन दिले आहे. आता जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणार आहे, असे यावेळी महापौरांनी सांगितले.
गाडय़ांवरही कालच्या बैठकीत चर्चा
मार्केटमधील ते 14 गाडे मनपाने ताब्यात घेतले आहे त्यांना अजून जागा निच्छित पेली नाही. जागा निवड झाल्यावर हे गाडे त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. शहरात सध्या विविध ठिकाणी मिळून 92 गाडे आहे. प्रत्येकाला जागा देणे शक्य नाही. तसेच त्यांच्याकडून मनपाच्या काही नियमांचे पालन केले जात नाही. सर्वत्र घाण दुर्गंधी करतात. यामुळे त्या 14 गाडय़ांवर मनपाने कारवाई केली होती. आता त्यांना सक्त आदेश देऊनही हे गाडे त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे असे कालच्या बैठकीत ठरविण्यात आले.