मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीला सत्तेची लालसा नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक हे एकमेव ध्येय आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर होणाऱया अन्यायाविरोधात न्यायालयीन लढय़ासोबत रस्त्यावरचा लढा देण्यास समिती समर्थ आहे. निवेदन देऊनही अद्याप अनधिकृत लालपिवळा ध्वज हटविण्यात आलेला नाही, कन्नड व इंग्रजी या भाषांसह मराठीतही फलक लावावेत व भाषिक जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार दि. 25 रोजी मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मध्यवर्ती म. ए. समितीची मराठा मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर उहापोह करण्यात आला. अल्पसंख्याक आयोगाकडून सीमावासियांची माहिती लपविण्यात आली. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हय़ात 22 टक्के मराठी भाषिक आहेत. असे असतानाही अहवालामध्ये चुकीचा उल्लेख करण्यात आला. संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास पुस्तकामध्ये समाविष्ट करणे, शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावरून राजकारण करणे हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा बैठकी दरम्यान देण्यात आला.
नाथ पै जन्मशताब्दी कार्यक्रम 10 रोजी
बॅ. नाथ पै यांचे सीमाप्रश्नाविषयीचे कार्य हे अतुलनिय होते. यावषी त्यांची जन्मशताब्दी असल्याने मध्यवर्ती म. ए. समितीच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला जाणार आहे. रविवार दि. 10 रोजी प्रा. आनंद मेणसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वा. खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे हा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
मोर्चाविषयी चर्चा करण्यासाठी शुक्रवार दि. 8 रोजी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्यात येणार असल्याचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सांगितले. यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, एस. एल. चौगुले, संभाजी देसाई, सुर्याजी पाटील, अजित पाटील, नाना पाटील, रविंद्र पाटील, राजु मरवे, कृष्णकांत बिरजे, परशराम पाटील, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, बी. डी. मोहनगेकर, रणजित चव्हाण-पाटील, देवाप्पा गुरव, जयराम मिरजकर. डी. एस. पाटील, सुरेश राजुकर, रावजी पाटील, डी. ओ. येतोजी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.