प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर व जिह्यातील पक्ष संघटना वाढावी आणि सोलापूरच्या विकासाचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून जिह्यात विकास करायचा आहे, म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर सोलापूरच्या पालकमंत्र्याची जबाबदारी दिली आणि प्रथमच सोलापूरला आलो आहे. म्हणून हार-तुरे, फेटे आणि फटाके ठिक आहे. या पुढे मला भेटायला काहीच आणू नका, मी फेटा कधीच बांधत नाही. फेटाच्या बदल्यात पैसे घेतो. या पैशाची लगेच त्यांना पावती देतो. फेटय़ातून मिळणारी रक्कम सरकारी रुग्णालयातील रुग्णांसाठी खर्च करतो. फेटय़ातून आम्हाला वर्षाला आठ ते दहा लाख रूपये मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
शनिवारी सोलापूरच्या पालकमंत्री निवड झाल्यानंतर वळसे-पाटील यांचे आगमन झाले. शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव शिंदे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. युन्नूस शेख, माजी राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश गादेकर, कार्याध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, राजूबापू पाटील, जि. प. चे कृषी सभापती अनिल मोटे, सरचिटणीस लतिफ तांबोळी, मानाजी माने, किसन जाधव, संजय पाटील-घाटनेकर, रणजितसिंह शिंदे, विक्रांत माने, जुबेर बागवान, राजू कुरेशी, फारुक मटके, राजन जाधव, सुनिता रोटे, जनार्दन कारमपुरी, चंद्रकांत पवार, वसंतराव देशमुख, माजी जिल्हा परीषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, डॉ.निशिंगंधा माळी, अनिता नागणे, निरंजन भूमकर, जावेद खरादी, निशांत साळवे, सुहास कदम उपस्थित होते.
पुढे वळसे-पाटील म्हणाले, लोक प्रेमापोटी फेटे बांधतात आणि बांधलेल्या फेटय़ांचे आपण काय करतो ? हे सर्वांनाच माहिती आहे. एक फेटा किमान शंभर रूपयांना मिळतो. या पुढे मला भेटायला येताना काहीच आणू नका, अन्यथा फेटय़ाचे पैसे रोख स्वरूपात द्या, असे आवाहन वळसे-पाटील उपस्थित मेळाव्यात केली.
पक्ष संघटना आणि विकासासाठी मला पाठवले आहे. आपले सरकार तीन पक्षांचे आहे. राष्ट्रवादीसोबतच शिवसेना व काँग्रेसलाही सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे. सोलापूरच्या विकासाचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून जिह्यात विकास करायचा आहे, म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला सोलापूरची जबाबदारी दिली आहे. प्रास्ताविक उमेश पाटील यांनी केले. स्वागत शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भारत जाधव यानी केले. याप्रसंगी उत्तम जानकर, लतीफ तांबोळी, सुनिता रोटे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने, आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मनोगत व्यक्त करून सोलापूर शहर जिह्याच्या प्रश्नांचा आढावा मांडला.
दर दोन दिवसाला सोलापुरात
सोलापूरच्या विकासाचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गे लावायचे आहे. यापुढे मी दोन दिवसांसाठी सोलापूरला येईन. त्यातील अर्धा दिवस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि अर्धा दिवस अधिकाऱयांसाठी असणार आहे. अधिकाऱयांसोबत बैठक घेतल्याशिवाय प्रश्न मार्गो लागणार नाहीत, असेही वळसे-पाटील म्हणाले.
अजून काय म्हणाले, वळसे– पाटील
सोलापूर जिल्हा हा खासदार शरद पवार यांचे प्रेम असणारा जिल्हा आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना साहेब म्हणून नव्हे तर सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रलंबित प्रश्न बारकाईने लक्ष घालून येथील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सोडवणार आहे. येत्या काळात जिह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य रितीने नियोजन, शहरासाठी पाणीपुरवठा करणारी दुहेरी पाईपलाईनचे काम गतिमान करणे, श्री संत बसवेश्वर, संत चोखामेळा स्मारक, जिल्हा मध्यवर्ती बँक, शेतकरी अनुदान, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.