ऑनलाइन टीम / मुंबई :
जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस देशातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. तसेच कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडून घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, यावर्षी कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हे संकट रोखायचे असेल तर अंतर ठेवून वागावे लागेल. त्यामुळे मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला आवाहन करतो कि, 11 एप्रिल ला महात्मा फुले यांची, 14 एप्रिल ला आंबेडकरांची जयंती आहे. ती आपण घरात बसूनच यांची जयंती साजरी करावी.
तसेच कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक जयंती साजरी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असं ही ते यावेळी म्हणाले.