प्रतिनिधी /बेळगाव
कपिलेश्वर मंदिरसमोर, महाद्वार रोड येथे मागील चार वर्षांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी रस्त्यावरच साचून रहात असल्याने येणा जाणाऱया वाहनचालकांना या पाण्यामधूनच वाहने चालवावी लागत आहेत. पाणी वाया जात असले तरी दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाने या समस्येकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. महाद्वार रोड येथील मुख्य मार्गावर गळती लागली आहे. ज्यावेळी जलवाहिनीतून पाणी सोडले जाते त्यावेळी पाणी रस्त्यावर येत आहे. सतत पाणी साचून राहिल्याने डबक्मयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाहने या पाण्यामधून ये-जा करीत असल्याने पाणी उडून रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही अद्याप दुरुस्ती केलेली नाही. यामुळे ही समस्या कोण सोडविणार, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.