खानापुर / पिराजी कुऱहाडे
खानापूर तालुक्मयात गेल्या 4 व 5 ऑगस्ट रोजी वादळी वाऱयासह झालेल्या तुफान पावसाने 48 तासात कणकुंबी येथे तब्बल 517 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. परिणामी मलप्रभा नदीसह ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे तालुक्मयातील रस्त्यांची पार दुरावस्था झाली आहे. अनेक मार्गावरील रस्ते सध्या बंद असून बहुतांश रस्ते व मलप्रभा नदीवरील बंधारे लाल फितीत अडकले आहेत. त्यामुळे तालुक्मयातील रस्त्यांची तसेच मलप्रभेवरील बंधाऱयाच्या दुतर्फा तुटलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.
मागील वषी पुराच्या तडाख्याने हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकाना तुटलेल्या रस्त्यातूनच पायवाटा काढाव्या लागल्या. वर्ष उलटले तरी विकासाचा नारळ फुटला नसल्याने अनेक रस्ते विकासाच्या प्रतीक्षेत असताना पुन्हा यावषीही दोन दिवसात झालेल्या महापुरामुळे त्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. खानापूर तालुक्मयाच्या मध्यातून जाणाऱया मलप्रभा नदीच्या पाणी अडवण्याच्या अनेक बंधाऱयात लाकडे अडकल्याने बंधारे धोक्मयात आले. मागील वषी मळव जवळील पाणी अडवण्याचा बंधारा पुराच्या प्रवाहाने एक बाजुने पूर्णतः खचला आहे. पण दुरुस्तीसाठी मात्र लघु पाटबंधारे विभागाने कोणत्याच हालचाली हाती घेतल्या नाहीत. असोगा येथील पाणी अडवण्याच्या बंधाऱयाची याहून वेगळी परिस्थिती नाही. बंधाऱयात पाच ते सात टन घनकचरा सातत्याने दुतर्फा पाणी जाऊन बंधाऱयाच्या दुतर्फा शेतीवाडीचे मोठे नुकसान करत आहे. मात्र याकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
त्याच प्रमाणे खानापूर शहरांतर्गत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावरील नवीन पुलावरून देखील या वषी पाणी गेले. मागील वषी तब्बल तीन ते चार दिवस या पुलावर पाणी होते. यावषीदेखील पुराचा तडाका या पुलाला बसला आहे. रुमेवाडीक्रासच्या बाजूने पुलाचा कठा पुराच्या प्रवाहाने तुटला गेला आह.s शिवाय या बंधाऱयाच्या बाजूला नवीन फिश मार्केट जवळ रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. अगोदरच महामार्गाच्या दुरुस्तीवेळी रस्त्याची उंची न करता पुलाच्या समपातळीत रस्ता करण्यात आल्याने या ठिकाणी शेतवडीतील पाणीसाठा येऊन रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. शिवाय रुमेवाडी सर्कलमध्ये ज्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आला आहे. त्या ठिकाणी गतीरोधकाच्या बाजूलाच मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधाराकाना मोठा धोका निर्माण झाला आहे. या गतीरोधकापासून शंभर फूट अंतरावर राष्ट्रीय महामार्ग एका बाजूने खचल्याने शेततळय़ातील पाणी साठा मोठया प्रमाणात रस्त्यावर साचत आहे त्यामुळे याठिकाणी ही अपघाताची घंटा निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातर्गत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर ते गोवा कत्री पर्यंतच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खानापूर ते पारीश्वाड रस्त्यावरील शांतिनिकेतन शाळेपर्यंतचा रस्ता मागील महालक्ष्मी यात्रा उत्सवाच्या काळात विकसीत झाला पण शांतिनिकेतन शाळेच्या प्रवेशवदारावर नाहक खोदलेल्या रस्त्यावर शंभर फूट अंतरावर शंभर खड्डे पडल्याने वाहनधारकांना मात्र याची कसरत करावी लागत आहे. वर्ष उलटले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठिकाणचा रस्ता दुरुस्ती करण्याचे काम मात्र हाती घेतले नाहा.r
खानापूर नदी घाटाजवळ बांधण्यात आलेल्या नवीन पाणी अडवण्याच्या बंधाऱयाच्या शहराच्या बाजूने रस्त्याची उंची फारच कमी झाल्याने महापुराचे पाणी त्या रस्त्यावरून जाऊन रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे. या बंधाऱयाची उंची भक्कम झाली असली तरी बंधाऱयाच्या दुतर्फा मात्र रस्ता उंची करण्यात आला नसल्याने महापुराचे पाणी दुतर्फा जाऊन मोठे नुकसान होत आहे. मागील वषी देखील बंध्याच्या बाजूला टाकण्यात आलेला भराव वाहून गेला होता. त्यामुळे उत्तमरित्या निर्माण झालेल्या बंधाऱयामुळे मात्र दुतर्फा रस्त्याची व शेतवाडीचे मोठे नुकसान होत आहे.
यडोगा बंधारा दुतर्फा खचला, रस्ता वहातुक बंदच
मलप्रभा नदीवरील यडोगा बंधाऱयाला ही यावषी मोठा धोका पोहोचला आहे. या बंधाऱयावर दरवषी महापुराचे पाणी येते मात्र विशेषता बंधाऱयाच्या दुसरे कोणतेच नुकसान होत नाही या वषी पावसाळय़ापूर्वी या बंधाऱयाच्या दुरुस्तीसाठी लघु पाटबंधारे विभागाने जवळपास 48 लाखाचा निधी मंजूर करून फेर कॉक्रिटीकरण केले परंतु रस्त्याच्या दुतर्फा भक्कम भराव टाकला नसल्याने पुरामुळे बंधाऱयाच्या दुतर्फा रस्ता वाहून गेला आहे. बंधाऱयाचे काम हाती घेताना कंत्राटदाराने रस्ता अडवण्यासाठी बंधाऱयाला लागून जेसीबीने चर मारली होती. मात्र वेळीच न भरता तशीच सोडल्याने महापुराने वाहुन जावुन फटका बसला आहे. तर यडोग्याच्या बाजूने बंधाऱयाची संरक्षण भिंत वाहून गेल्याने खालचा भाग निकामी झाला आहे त्यामुळे या पुलाच्या दुतर्फा मोठा धोका निर्माण झाला आहे. चार दिवसापासून सदर रस्ता बंद ठेऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.