70 वर्षांनी हस्तिनापूरमध्ये होणार उत्खनन- पुरातत्व विभागाकडून तयारी
वृत्तसंस्था/ मेरठ
महाकाव्य ‘महाभारत’मध्ये कौरवांची राजधानी हस्तिनापूरच्या कथेशी संबंधि रहस्ये जाणून घेण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (एएसआय) मोठे पाऊल उचलले आहे. एएसआयचे पथक मेरठपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी उत्खनन सुरू करणार आहे. मागील 70 वर्षांमध्ये अशाप्रकारचा हा पहिला मोठा प्रकल्प आहे. याच्या माध्यमातून इतिहासातील ‘महाभारता’ची पुष्टी आणि पूर्वीच्या शोधांना सुरक्षित करण्यासाठी नव्या पुराव्यांचा शोध घेण्यात येणार आहे.
टेकडी असलेल्या क्षेत्रांचे संरक्षण आणि जुन्या मंदिरांना नवे रुप देण्यावरच आतापर्यंत लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सप्टेंबरनंतर उत्खनन करणार आहोत अशी माहिती एएसआयच्या मेरठ विभागाचे सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट ब्रजसुंदर गडनायक यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱया 5 ठिकाणांमध्ये हस्तिनापूरचा समावेश आहे. 2020 च्या अर्थसंकल्पात राखीगढी (हरियाणा), शिवसागर (आसाम), धोलावीरा (गुजरात) आणि आदिचल्लानूर (तामिळनाडू) सोबत हस्तिनापूरला आयकॉनिक साइट्सच्या स्वरुपात विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती.
1952 मध्ये प्रथम उत्खनन
हस्तिनापूरमध्ये पहिले उत्खनन 1952 मध्ये झाले होते. महाभारत कालखंड ख्रिस्तपूर्व 900 वर्षांदरम्यान होता आणि नगरी गंगेच्या पुरात वाहून गेल्याचा निष्कर्ष आर्कियोलॉजिस्ट प्राध्यापक बीबी लाल यांनी तेव्हा काढला होता. बीबी लाल यांनी अयोध्येत वादग्रस्त बाबरी ढांचाखाली 12 मंदिर स्तंभांच्या ‘शोधा’साठी ओळखले जाते. मोदीनगरच्या मुल्तानिमल मोदी कॉलेजमध्ये इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. के.के. शर्मा यांच्यानुसार त्यानंतर कुठलाच ठोस विकास झाला नाही. 2006 मध्ये हस्तिनापूरपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर सिनौलीमध्ये एक प्राचीन दफनभूमीचा शोध आणि 2018 मध्ये एका तांब्याच्या युद्धरथाच्या शोधाने महाभारत काळातील असल्याचे समोर आले होते. शर्मा हे 2006 च्या सिनौली येथील उत्खनन कार्यात सामील होते.
मातीची भांडी हस्तगत
मागील वर्षी ऑगस्टमध्ये हस्तानपूरमध्ये ख्रिस्तपूर्व तिसऱया शतकातील मातीची भांडी सापडली होती. त्यांचे डिझाइन बरेलीतील अहिच्छत्र या प्राचीन भूरचनेसमान होते. अहिच्छत्रचा उल्लेघ महाभारतात उत्तर पांचालची राजधानी म्हणून आहे.