छताचा पत्रा फोडून चोरटे घुसले दुकानात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत पुन्हा एकदा चोरटय़ांनी मंगळवारी मध्यरात्री हातखंबा येथे दोन दुकान गाळे फोडून डोके वर काढले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील या घटनेची घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत देसाई यांचे हातखंबा येथे दोन गाळे आहेत. त्यांनी ते भाडय़ाने दिले होते. यामध्ये एका गाळय़ात गाडय़ांचे पार्ट व मॅकेनिकचा व्यवसाय होता तर दुसऱया गाळय़ात सामान ठेवण्यात आले होते. या दोन्ही गाळय़ांचे पत्रे फोडून चोरटय़ांनी गाळय़ात प्रवेश केला. आतील सामानाची चोरी करुन रोख रक्कम लंपास केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी मध्यरात्री हे गाळे फोडण्यात आले. बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या ही घटना निदर्शनास येताच त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. याविषयी दाखल गुन्हय़ाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.