ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविकास आघाडीने गुरुवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबतचा अध्यादेश आज जारी केला. लॉकडाऊनबाबतच्या नव्या गाईडलाईन्स अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. केंद्र सरकारची नवी नियमावली येईपर्यंत जुने नियम लागू होतील, असे या आदेशात म्हटले आहे.