ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना विषाणू संपूर्ण जगात थैमान घालत आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांना बसला. शैक्षणिक क्षेत्रातही अनेक अडचणी निर्माण झाला. पण या सर्वांवर मात करून आणि यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा काहीशा उशिरा घेतल्या जाणार आहेत.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांची तारीख आज जाहीर केली आहे.
त्या म्हणाल्या, यावर्षी 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान सुरु होईल. तर 12वीचा निकाल जुलै अखेर जाहीर केला जाणार अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
तर इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 च्या दरम्यान होणार असून निकाल ऑगस्ट अखेरीस जाहीर केला जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.