ऑनलाइन टीम / सोलापूर :
काही आमदार आणि राजीनामे देणार आहेत. खातेवाटपा अगोदरच राजीनामा देण्याची सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार टीकणार नाही असा दावा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.
ही शिवसेनेची सत्ता नसून राष्ट्रवादीची सत्ता आहे. या सरकारमध्ये कॉग्रेस व शिवसेनेचे अस्तित्वच नाहीये अशी टिका नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
ते म्हणाले, या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना एक टक्का देखील महाराष्ट्राच्या प्रशासनाचा अभ्यास नाही. त्यांचा कोणताही वचक नाही. त्यामळे ते या ठिकाणी खातेवाटप देखील करू शकलेले नाहीत.
तसेच तीन पक्ष एकत्र येणं हे गणितच चुकलं आहे. या प्रत्येक पक्षाची धोरणं वेगळी आहेत. मात्र, हे तिन्ही पक्ष जनतेसाठी नाहीतर सत्तेसाठी एकत्र आले आहेत.