इंदोर / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिका व क्रिकेट विश्वचषक टी-20 संभाव्य महिला संघाची रविवारी निवड केली जाणार आहे या तिरंगी मालिकेमध्ये भारत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या तीन देशांचा समावेश असून दि. 31 जानेवारी रोजी कॅनबेरा येथे मालिकेला प्रारंभ होईल. या स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन वेळा जातील आणि त्यानंतर स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे.
21 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी या तिरंगी स्पर्धेमुळे भारताचे भारतीय संघात कोण असेल हे चित्र स्पष्ट होईल, असे सध्याचे स्पष्ट संकेत आहेत. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होत आहे सिडनीमध्ये ते यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली पहिली लढत खेळतील. ऑस्ट्रेलिया आणि आजवर चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे दोन संघ महिला क्रिकेटमध्ये दोन दिग्गज संघ मानले जातात.
या स्पर्धेबद्दल वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआय पदाधिकारी म्हणाले, ‘ही तिरंगी मालिका अतिशय महत्त्वाचे आहे ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या संघांचा तिंरगी मालिकेत समावेश असल्याने आपले कोणते खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, हे या स्पर्धेमुळे स्पष्ट होणार आहे. बहुतांशी खेळाडूंची निवड या स्पर्धेतील प्रदर्शनावरूनच होणार असल्याने एकंदरीत ही तिरंगी मालिका महत्त्वाची ठरणार आहे
भारतीय संघ 2019 मध्ये सलग सहा वेळा पराभूत झाला होता. पण ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेला मायदेशात 3-1 अशा फरकाने पराभूत करत व विंडीजला त्यांच्या भूमीत 5-0 अशा फरकाने पराभूत केले होते. तिरंगी मालिकेत जो संघ खेळेल, तोच संघ विश्वचषकात ही खेळण्याची शक्मयता आहे. मागील महिन्यात अ भारतीय संघाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया दौरा केला, त्या दौऱयातील कामगिरीचा निकष यावेळी ठेवला समोर ठेवला जाणार आहे.
रविवारी निवड समिती पंधरा सदस्य संघ निवडणार आहे. सध्या क्रिकेट सल्लागार समिती अस्तित्वात नसल्याने हीच निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सुद्धा संघ निवड करेल. एकदा क्रिकेट सल्लागार समिती ती स्थापन झाल्यानंतर ती समिती निवड समितीची नव्याने रचना करेल, असे संकेत आहेत.