प्रतिनिधी / करवीर
महे तालुका करवीर येथील सचिन शंकरराव पाटील यांचा ठोक माळ येथे गुरांचा गोठा आहे. त्या गोठ्यामध्ये त्यांच्या दहा गाई व एक म्हैस अशी जनावरे होती .आज पहाटे त्या गोठ्यातील सर्वच जनावरे गायब आहेत, हे पाहिल्यानंतर त्यांनी आजूबाजूला परिसरात शोधा शोध केली. ती न मिळाल्याने ती चोरीला गेलेले आहेत, अशी करवीर पोलीस स्टेशन नोंद करण्यात आली आहे.
अलीकडे मुलांना नोकरी मिळत नाही म्हणून शिकलेली मुले शेती करत करत पशुपालन करतात.पण गुरांना गोठ्यासाठी गावा लगत जागा नसल्याने गोठा शेतीच्या ठिकाणीच बांधला जातो. गावापासून दूर असलेल्या या गोठ्याजवळ सायंकाळची, जेवणाची वेळ व रात्रीचे कोणी नसलेले पाहून चोरटे आपले काम करतात.
ऑगस्ट 2019 रोजी याच परिसरातून तुकाराम जरग यांच्या दोन म्हैशी, तर 2015 साली कृष्णात जाधव यांच्या दोन म्हैशी चोरीला गेलेल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे या भागात शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.