नवी दिल्ली –
देशामध्ये आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1.55 लाखापेक्षा अधिकच्या कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. वर्षभराच्या तुलनेत 27 टक्क्यांनी ही वृद्धी उल्लेखनीय राहिली असल्याची माहिती आहे. मागील आर्थिक वर्षात कोरोना महामारीच्या कारणामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने उद्योग क्षेत्रावर संकट ओढवले होते. त्या तुलनेत ही कामगिरी सकारात्मकच असल्याची माहिती आहे.
कॉर्पोरेट संदर्भात माहिती देणाऱया मंत्रालयाच्या माहितीनुसार कोविड महामारीच्या कारणामुळे देशात निर्माण झालेल्या संकट कालावधीत देशातील उद्योगधंदे सावरत गेले असल्याने ही बाब महत्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या दरम्यान 1.22 लाख कंपन्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1.55 लाखपेक्षा अधिक कंपन्यांची नोंदणी करण्यात आली असून नोंदणीचा वृद्धीदर 27 टक्के इतका नोंदला गेला आहे.