श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या विवाहाची कथा वर्णन करताना एकनाथ महाराज पुढे म्हणतात-
समाधिसुख तेंचि आसन । मुक्तमंडित चौक जाण। बैसावया श्रीकृष्ण । भीमकें विंदान मांडिलें ।
चाऱही पुरुषार्थांची चवाई । तेंचि आसन त्यावरी पाहीं । पूजावया निजजावई । भीमक ठायीं ति÷त ।
म्हणती आचार्य सावधान । शब्द सांडून धरा मौन। वर वरि÷ श्रीकृष्ण । फल संपूर्ण त्या हातीं ।
पाहातां श्रीकृष्णाचें रूपडें । अरूपरूपें कृष्ण चहूंकडे । विस्मयें भीमक झाले वेडे । मागे पुढें कृष्ण देखें । अनंत रूपें यादवपती । कैसेनि मी पूजूं श्रीपती ।
पूज्यपूजकतावृत्ती । हेही स्थिती नाठवें । केवळ प्रपंच तें वऱहाड । परी भीमकाचें भाग्य वाड । परत परमार्थाचें कोड । वऱहाड गोड त्या झालें ।
वर पूजनासाठी श्रीकृष्णाला ज्या आसनावर बसवायचे ते कशाचे होते? भीष्मकाने मुक्त मोत्यांचा चौक बनवला होता व त्यात समाधीसुखाचे आसन श्रीकृष्णाला बसायला मांडले होते. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थाचा चौरंग श्रीकृष्णाच्या आसनासाठी मांडून भीष्मक राजा आपल्या जावयाच्या, वर पूजनासाठी ति÷त उभा होता. आचार्य म्हणाले-सावधान! काहीही न बोलता मौन धरा. श्रीकृष्ण हा सामान्य वर नसून सर्वश्रे÷ आहे. आपल्या कर्माचे कोणते फळ केव्हा द्यावे हे सर्व त्याच्याच हातात आहे. भीष्मकाने जेव्हा श्रीकृष्णाचे रूप पाहिले तेव्हा अरूपाचे ते सर्वव्यापक रूप पाहून त्याला चहुकडे कृष्णच दिसू लागला. विस्मयाने भीष्मक वेडा झाला. त्याला मागे पुढे सगळीकडे कृष्णच दिसू लागला. हा यादवपती कृष्ण अनंत रूपांनी नटलेला आहे. पूज्यही तोच आहे व पूजकही तोच! मग याची पूजा कशी करावी हे भीष्मकाला कळेना. वऱहाड ही प्रापंचिक बाब खरी पण भीष्मकाचे भाग्य मोठे की वर परमात्मा असल्याने वऱहाडही परमार्थिक गोडवा देणारे झाले.
उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळी नृपती ।
तीर्थें चरणतीर्थ मावती। कृष्णपदप्राप्ति दुर्लभ ।
कृष्णकपाळा पावे कोण । तेथेंही सप्रेम चंदन।
भीमकें अर्पिलें शुद्ध सुमन। कृष्णभजन निजभावें।
शुद्धसत्त्वाचें विरजांबर। चिद्ररत्नांचे अलंकार ।
भीमकें अर्पूनियां अपार । कृष्ण वरावर पूजियेला ।
भीमक गौरवी व्याहीयांसी। व्याहींरूपें देखे कृष्णासी ।
भूतमात्रीं हृषीकेशी । निजवृत्तीसी ठसावला ।
शुद्धमती राणी कलशातून पाणी ओतू लागली व भीष्मक राजा श्रीकृष्णाचे पाय धुऊ लागला. त्या जलधारा कृष्णाच्या चरणी सामावून पवित्र होत होत्या. कृष्णपद प्राप्तीचा दुर्लभ योग त्यांना लाभला होता. कृष्णाच्या कपाळी कोण पोहोचणार? राजा भीष्मकाने प्रेमाचे चंदन कृष्णाच्या कपाळी लावले. आपल्या शुद्ध मनाची फुले कृष्णाला वाहिली आणि भावपूर्ण कृष्ण भजनात तो रंगून गेला. शुद्धसत्त्वाचे विरजांबर वस्त्र व चिद्रत्नांचे अपार अलंकार अर्पण करून भीष्मकाने श्रीकृष्णाचे वर पूजन केले.