आशा, अंगणवाडी सेविकांची पिळवणूक, स्वयंसेवक मिळेनात, आरोग्य सेविका-कर्मचारी जाईनात, होम आयसोलेट रुग्ण ’आत्मनिर्भर’
प्रतिनिधी / सातारा
एकीकडे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हय़ातील जनता पॅनिक झालीय. कोणाला बेड मिळेना, कोणाला ऑक्सिजन मिळेना तर कोणाला इंजेक्शन मिळेना अशी अवस्था आहे. तर प्रत्येक कुटुंबांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची पूर्ण धुरा आशा सेविकांवर सोपवली आहे. त्या शासनाच्या कर्मचारी नसताना देखील त्यांच्याकडून काम करवून घेत पिळवणूक सुरु असून या मोहिमेवर आरोग्य सेविका, कर्मचारी जाईनात अन् स्वयंसेवकही मिळेनात अशी अवस्था जिल्हय़ात सुरु आहे.
15 सप्टेंबरपासून जिल्हय़ात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरु करण्यात आलीय. मोहिमेंतर्गत जिह्यातील 6 लाख 80 हजार कुटुंबांना पथक भेट देणार आहेत. पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा आणि 2 स्थानी स्वयंसेवक (1 पुरुष व 1 स्त्राr) असतील हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहेत. सरपंच, नगरसेवक यांच्याकडून स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्याऐवजी 1 आरोग्य कर्मचारी, आशा देण्यात यावी. अशा वेळी पथकात 2 आरोग्य कर्मचारी, आशा असतील. महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भाग यामध्ये बहुविध आरोग्य सेविका (स्त्राr) (ए. एन. एम.), बहुविध आरोग्य सेवक (पुरुष) (आरोग्य सेवक), आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बाल कल्याण विभागांची परवानगी घेऊन). किमान 10 वी पास कोविड दूत (स्वयंसेवक) प्रत्येक पथकात 1 पुरुष व 1 स्त्राr. इतर कर्मचारी (उपरोक्त मधून पुरेसे कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर) प्रत्येक 5 ते 10 पथकामागे 1 डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र) प्राथमिक आरोग्य पथक किंवा समुदाय आरोग्य अधिकारी असे नियोजन करण्यात आलेय.
मात्र एक आठवडाभर ही मोहीम सुरु करण्यात आली असून त्याला सहकार्य करा असे आवाहन मंत्रीमहोदयांसह जिल्हाधिकाऱयांनी केले. मात्र काही ठिकाणी सर्व्हे गांभीर्याने सुरु झाला असला तरी असंख्य गावात, शहरात अद्याप टीमच तयार नाहीत. आरोग्य विभागाने सरळसरळ आशा सेविका, अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर भार टाकून हात मोकळे केलेले आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वेळोवेळी धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याची सवय लावावी या गोष्टी जिल्हय़ातील जनता गेल्या सहा महिन्यांपासून करु लागलीय. मात्र, तीच जनजागृती पुन्हा करताना तपासणीचा मुख्य उद्देश आहे. मात्र ही तपासणी करण्यासाठी जी पथके निर्माण केलीत ती कागदोपत्रीच असून अनेक ठिकाणी आशा सेविकांना सर्व्हे करण्यास सांगितले आहे. स्वंयसेवक म्हणून कोणाची तरी नावे टाकली जातात पण ते पथकाबरोबर हजरही नसतात.
दररोज 50 घरेही होत नाहीत
दररोज 50 घरांच्या भेटी घेणे, त्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करणे, त्यांची माहिती ऍपमध्ये लोड करणे ही कामे करताना आशा सेविकांची तारांबळ उडत आहे. काही आशा सेविकांना इंग्रजीतून माहिती भरणे शक्य होत नाही. मग त्या आशा सेविकांना तुम्ही कागदावर माहिती भरा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात द्या, असे खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीच सांगत असल्याची माहिती आशा सेविकांनी दिलीय. म्हणजे ही मोहीम कागदोपत्रीच यशस्वी करण्याचे काम सध्या सुरु असल्याचे दिसत आहे.
होम आयसोलेट रुग्ण आत्मनिर्भर
सातारा जिल्हय़ात 5 हजाराच्या आसपास बाधित असलेले पण कोणतेही लक्षणे नसलेले नागरिक होम आयसोलेट आहेत. त्यांना शासनातर्फे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, ऑक्सिजन, पल्स मोजण्यासाठी ऑक्सिमीटर, सॅनिटायझर आदींचे किट देण्यात येणार होते. मात्र आयसोलेट असलेल्या या नागरिकांना आरोग्य विभागाकडून अशा प्रकारचे कोणतेही किट मिळालेले नाहीत. स्वखर्चाने हे साहित्य रुग्ण घेत आहेत व आपापल्या घरात स्वतंत्र खोलीत होम आयसोलेटशन पूर्ण करत आहेत. त्यांना भेटी देण्यासाठी आशा सेविकाच जात असून त्याच खऱया अर्थाने कोरोना योध्दा असून त्यांचीच फक्त 2 हजार मानधनावर बोळवण केली जात असल्याचे विदारक चित्रही जिल्हय़ात आहे.