ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मला किती लाठय़ा मारा, माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच आहे. हे कवच मला काहीही होऊ देणार नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. आसामच्या कोकराझारमध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या आहे. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी घेतलेल्या एका सभेत बोलताना ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत दांडय़ांनी मारतील’ असं म्हटलं होतं.
तसेच बुधवारी राहुल गांधी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. रोजगारनिर्मिती केंद्र सरकार कधी कऱणार असाही प्रश्न उपस्थित केला.