वार्ताहर / शिखरशिंगणापूर :
कोरोनाच्या सावटाखाली माण तालुक्यातील दहिवडी, वावरहिरे, बिजवडी,वडगाव, दानवलेवाडी, शिंगणापुर परिसरातील शेतकर्यांनी खरिप हंगामाच्या शेती मशागतीची कामे जवळपास पुर्ण केली आहेत. आता फक्त मान्सुनचे आगमन व चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत माणचा बळिराजा असल्याचे दिसुन येते.पेरणीपुर्व मशागतीची कामे शेतकर्यांनी टॅक्टरच्या तसेच बैलाच्या सहाय्याने केली आहेत.तर काही ठिकाणी पेरणीपुर्व कामे करण्यात शेतकरीवर्ग व्यस्त असल्याचे दिसत आहेत.गतवर्षी या भागाला वरुण राजाने हुलकावणी दिल्याने रेंगाळलेल्या पावसामुळे खरिप पिक शेतकर्यांच्या हाताला लागले नव्हते.त्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात आर्थिक संकटात सापडला होता. उशीरा झालेल्या मान्सुनामुळे खरिप पिकाच्या मशागतीचा खर्चही देखील भरुन निघाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मोठय़ा विवंचनेत सापडला होता.उशीरा झालेल्या मान्सुनामुळे खरिप पिकाची मशागत वाया गेली तर रब्बी पिकाने बळिराज्याला कसबसे तारले.परंतु पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण भारतात झालेल्या लॉकडावुन मुळे खाजगी वाहतुक व बाजारपेठा बंद असल्याचा फटका बळीराजाला बसला.कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने टोमॅटो ,वांगी मेंथी,कोथिबीर यासारख्या नगदि पिकांचे तसेच कलिंगड,काकडी यासारख्या उन्हाळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.एकुणच या सर्व उद्भवलेल्या संकटांना तोंड देत सावरण्यासाठी बळिराजा पुन्हा नव्या जोमाने खरिप पेरणीपुर्व मशागत करु लागला या आठवडय़ात झालेल्या तुरळक पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील मुख्य पिक असणार्या बाजरी पिकाच्या पेरणीस शेतकयांनी सुरूवात केली आहे. तर अपेक्षित पाणी साठा असणंया ठिकाणी भुईमूग,, मूग या पिकासाठी जमिनीची मशागत सुरू असून कांदा रोपाची लागण करण्यात महिलावर्ग व्यस्त असल्याचे पहायला मिळतेय.नव्या उमेदीने खरिपाच्या स्वागता साठी शेतकरी सज्ज झाल्याचे चित्र आहे
गतवर्षीच्या उशीरा झालेल्या मान्सुनच्या आगमनामुळे खरिप तसेच रब्बी पिकांच्या मशागतीचा खर्च देखील भरुन निघाला नव्हता.तर सध्या कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे.गतवर्षीच्या रब्बी व खरिप हंगामामुळे शेतीची सर्वच आर्थिक गणित बिघडली होती.त्यामुळे आता ट्रकटर यांत्रिकरण मशागत सर्व सामान्य शेतकयाला परवडणारी नाही बैलानं ची मशागत ही दिवसाला 1000, ते 1200 बैल जोडी आहे