अध्याय बारावा
प्राण अपानादी वायूंची स्थाने सांगून झाल्यावर भगवंत उद्धवाला परा पश्यन्ती इत्यादि वाणींबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, स्वाधि÷ानचक्रापासून मणिपूरचक्रात येताना जीव आणि मन ह्यांची ऐक्मयता होते. तेथे सूक्ष्मप्राण राहात असल्यामुळे पश्यंतीवाणी परावाणीशी ऐक्मय पावते. तेव्हा मनाला खेळाडूपणा उत्पन्न होऊन बाल्यदशा प्राप्त होते असे समज. त्यानंतर प्राण डुलत डुलत पुढे चालू लागतो व अनाहतस्थान गाठतो. तेव्हा पश्यंती वाणीच्याच अनुरोधाने मध्यमा नावाची वाचा उत्पन्न होते. ती मौनाची मिठी न सोडता आपल्याशीच गुणगुण करू लागते. तेथे मनाला मुग्धावस्था (सोळा वर्षे वयाच्या आंतील अवस्था ) प्राप्त होऊन ती मागेपुढे सांभाळताना अनेक प्रकारचे उपभोग व सुखस्थिति ह्यांची इच्छा करते. पण लज्जेने मुळीच बोलत नाही. मग प्राण मोठय़ा त्वरेने विशुद्धिस्थानाला प्राप्त होतो व तेथे उच्छृंखल अशा उदानाचे स्वरूप प्राण धारण करतो. तेव्हा मनालाही परिपूर्ण तारुण्यपण प्राप्त होते. त्या विशुद्धिचक्रामध्ये आतून परावाणीही येऊन मिळते आणि पश्यंती व मध्यमा ह्याही एक होतात. अशा प्रकारे त्या सर्व वाचा तेथे मोठय़ा दिमाखाने घुमावयास लागतात. त्यांच्या त्या झणकाऱयाच्या मागोमाग लागलीच तोंडातून वाणी प्रगट होते. ती तारुण्याने मोठी उन्मत्त झालेली असते व त्यामुळे ती स्वरांची आणि वर्णांची भलभलती बडबड सुरू करते.
याप्रमाणे सूक्ष्म नाद शिवाच्या संसर्गाने, प्राणाच्या संगतीने आणि षट्चक्रादि संस्कारांच्या योगाने वाणीच्या रूपाने बाहेर पडतो. ‘मरा’ हा शब्द ऐकला असता ती वाणी सर्वस्वी अमंगल अशी वाटते. पण तीच अक्षरे उलटी केली असता ‘राम’ या नावाने पवित्र होते. चांगला किंवा वाईट कसाही उच्चार केला असता वर्ण काही नाहीसे होत नाहीत. ते कायमच असतात. म्हणूनच वर्णाना ‘अक्षर’ (अविनाशी) असे म्हणतात. ह्याप्रमाणे वाणी पवित्र होत असते. जशी वाणी वर्णोच्चारांनी स्पष्टपणे प्रगट होते, त्याचप्रमाणे इतर इंद्रियांचीही प्रवृत्ती आहे. त्या त्या इंद्रियांची स्थिती देखील भगवंत उद्धवाला संक्षेपाने सांगत आहेत. ते म्हणाले, बोलणे, कर्म करणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे, वास घेणे, चव घेणे, पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, मनाने संकल्पविकल्प करणे, बुद्धीने निश्चय करणे, अभिमान धरणे इत्यादी सर्व क्रिया, महत्तत्त्व, तसेच सत्त्व, रज, तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये, हे सर्व मीच आहे असे समज. वाणी प्रगट होण्याचा जसा हा प्रकार आहे, त्याचप्रमाणे कर्माच्यामुळे इंद्रियांची प्रवृत्ती प्रकट होते. चरणांमध्ये गती आणि हातांची ग्रहणशक्ति (कोणतीही वस्तु धरण्याचे सामर्थ्य ) ही प्रगटपणे दिसतात. विसर्ग हा गुदद्वाराचा गुण आणि आत्यंतिक सुखोपभोग हा लिंगाचा गुण हे प्रगट होतात. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिये होत असे समज. दृष्टि ही देखणेपणाने व्यक्त होते, जिव्हा ही रस कसे चाखावयाचे हे जाणते आणि कान ऐकण्याचे काम करतात. शीत, उष्ण, मऊ, कठीण हे ज्ञान त्वचा ह्या इंद्रियामुळे व्यक्त होते. सुगंध किंवा दुर्गंध यांचे ज्ञान नाकामुळे होते. मनाचे संकल्प किंवा विकल्प, तसेच निश्चय हे बुद्धीचे कर्म होय, चिंतन हे चित्ताचे कर्म होय आणि मीपण हे अहंकाराचे कर्म होय. रजतमसत्त्वांचे विकार हे तर मूळमायेचे विकार आहेत. त्या तिहींचेही विवरण मी आता संक्षेपाने सांगतो. आधिदैव, आधिभूत आणि ज्याला अध्यात्म असे म्हणतात, त्या ठिकाणी जो प्रपंच वाढला, ते ईश्वराचे दृश्य स्वरूप होय. ईश्वर हा जगाचे मूळ कारण आहे. त्या कारणाहून भिन्न असे कार्य मुळीच होत नाही. ज्याप्रमाणे तूप थिजून घट्ट झाले, तरी ते तुपाहुन निराळे नसते. किंवा लाकडाचा घोडा केला आणि त्याची आंगलट, उभे राहण्याची ऐट, वगैरे प्रकारांनी तो अत्यंत शोभिवंत दिसला, तरी त्याने लाकूडपणा सोडलेला नसतो. खूर, खांदे हे सर्व लाकडाचेच. त्याप्रमाणे तीन गुणांपासून झालेली पंचमहाभूते ही शिवाचेच मूर्तिमंत स्वरूप आहेत.
क्रमशः