बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ : अनेक ठिकाणी पाणी साचल्याने समस्या : स्मार्ट सिटीच्या कामांमुळे चिखलाचे साम्राज्य
प्रतिनिधी / बेळगाव
दरवर्षी प्रतीक्षा करायला लावणाऱया मान्सूनने यावषी वेळेत आणि दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच दमदार सरी कोसळल्या. यामुळे पावसाने साऱयांनाच दिलासा दिला आहे. मात्र, अधिक पाऊस झाला तर शेतीला फटका बसण्याची भीतीही व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभर संततधार कोसळत होता. यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. काही ठिकाणच्या रस्त्यांवरही पाणी साचून होते. पावसाला सुरुवात झाल्यामुळे साऱयांनाच घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोटचा आधार घ्यावा लागत होता. संततधार पावसाने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या असून पेरणी झालेल्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र बुधवारी रात्री वडगाव परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. शहरामध्ये स्मार्ट सिटीची कामे अर्धवट आहेत. खोदाई करून ठेवलेल्या कामाची माती रस्त्यावरच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक रस्त्यांवरील सखल भागामध्ये पाणी तुंबले होते. तेथून ये-जा करणाऱया नागरिकांवर आणि वाहनांवर पाणी उडत होते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे वाहनांची संख्या कमी असली तरी कामानिमित्त आलेल्या वाहनचालकांमुळे पादचाऱयांना त्याचा फटका बसला.
यावर्षी वेळेत मान्सून दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, म्हणावा तसा जोर नव्हता. मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना फटका बसला. वाहनचालक, भाजीविपेते, फळविपेते, फेरीवाले यासह इतर बैठय़ा व्यापाऱयांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. प्लास्टिक कचरा मोठय़ा प्रमाणात अडकून बऱयाच ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. काही ठिकाणी तर प्लास्टिकच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडला होता. यामधून पादचाऱयांना चालताना कसरत करावी लागत होती.
शहरामध्ये विविध ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पाईप घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. तेथून पाण्याचा निचरा होत नव्हता. या पाण्यामधून वाहन चालविणेही अवघड जात होते. नेहमीप्रमाणे बसवेश्वर सर्कलजवळही पाणी तुंबून होते. धर्मवीर संभाजी चौक येथे स्मार्ट सिटीअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या बसथांब्यासमोरच पाणी तुंबून होते. बसथांब्यामध्येही पाणी शिरले होते. शहराचा मुख्य रस्ता असलेल्या खानापूर रोडवरील कॅम्प येथील ग्लोब थिएटरसमोरही पाणी साचले होते.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार पेठ परिसरात काही ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. बाजारपेठेत काही ठिकाणी दलदल निर्माण झाली होती. लॉकडाऊनमुळे सकाळच्या वेळीच मोठय़ा प्रमाणात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. ग्रामीण भागातील किरकोळ विपेते खरेदीसाठी सकाळीच बेळगावात दाखल झाले. त्यांना रेनकोट, छत्र्यांचा आधार घ्यावा लागला.
वडगाव परिसरात अनेक घरांमध्ये शिरले पाणी…
बुधवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे वडगाव परिसरात पाणीच पाणी झाले. साईनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. घरातून पाणी काढताना लहान मुले, महिलांना कसरत करावी लागली. अनेकांना घरे सोडूनच शेजारी किंवा इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागला.
गटारींमध्ये कचरा साचल्यामुळे पाणी रस्त्यांवर
मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसामुळे गटारींमध्ये कचरा साचल्यामुळे गटारीतील पाणी रस्त्यांवर येत होते. त्यामुळे अनेक रस्ते जलमय बनले होते. त्यामधून वाट काढताना साऱयांनाच मोठी कसरत करावी लागली. गटारी-नाले सफाई योग्यप्रकारे झाली नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असून आता याकडे महानगरपालिका लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
स्मार्ट सिटीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. या काळातच विविध पाईपलाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. गटारीला लागूनच ही खोदाई झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी गटारीत जाणे कठीण झाले आहे. तेव्हा ज्या ठिकाणी खोदाई झाली आहे, त्या परिसरात पावसाचे पाणी निचरा करण्याबाबत ठोस पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांना छत्र्या तसेच रेनकोट खरेदी करणे अवघड बनले आहे. मागील वर्षाचेच जुने रेनकोट घालून अनेक जण येत होते. मात्र, पावसाला जोर असल्यामुळे रेनकोटमधून पाणी आतमध्ये जात होते, अशा तक्रारी ऐकायला मिळत होत्या. कधी लॉकडाऊन खुलणार आणि आम्ही कधी नवीन रेनकोट तसेच छत्र्या घेणार याचा विचार अनेकांच्या मनात आला.