बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील भाजप सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या लपवली असल्याचा आरोप कर्नाटक काँग्रेसने केला आहे. दरम्यान, राज्य सरकार सुरवातीपासूनच कोरोना मृतांची आकडेवारी लपवत आहे, असे काँग्रेसने म्हंटले आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत चार लाख रुपये देण्याऐवजी कोरोनामुळे एकटाच कमावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना फक्त १ लाख रुपये देण्याचे सरकारने ठरवले आहे, असा आरोप पक्षाने केला आहे.
दरम्यान, पत्रकारांना संबोधित करताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी व माजी मंत्री एच. के. पाटील यांनी १४ जूनपर्यंत सांगितले की सरकारच्या नोंदीनुसार कोरोनामुळे तब्बल ३३,०३३ लोक मरण पावले होते. राज्य सरकारच्या नोंदीनुसार १ जानेवारी २०२१ ते १३ जून २०२१ या कालावधीत ३,२७,९८५ मृत झाले आहेत. येथे मुद्दा असा आहे की, ३३,०३३ ते ३.२८ लाखादरम्यान खूप मोठे अंतर आहे. राज्यात इतके नैसर्गिक मृत्यू झाले आहेत? असे वाटत नाही, असे पाटील म्हणाले. यावरून राज्य सरकार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या लपवत असल्याचे दिसून येत आहे.