अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, मनुष्याचा स्वभाव त्रिगुणांनी युक्त असतो आणि त्या गुणांच्या प्रभावानुसार त्याची निरनिराळय़ा प्रसंगात निरनिराळय़ा पद्धतीची वर्तणूक होत असते म्हणून कोणत्या प्रसंगी कोण कसा वागेल हे सांगता येत नाही असे म्हणतात ते यासाठीच. असे जरी असले तरी, मनुष्याचा आत्मा कशातच सहभागी नसतो कारण जरी तो गुणांच्या सहवासात असला तरी तो गुणांनी बाधित होत नाही. तो मुक्त असून साक्षीरूपाने काय काय घडते ते फक्त पहात असतो. अर्थात आत्मा बंधक नाही हे तुझ्या आता लक्षात आले असेल. अरे मनुष्य शरीरातील आत्मा म्हणजे मीच असतो आणि मला परमात्म्याला बद्धमुक्त अशी कोणतीच अवस्था नसते. एखादा नट नाटकात जरी भिकाऱयाचे काम करत असला तरी तो काही भिकारी नसतो, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतीने वावरत असलेला दिसला तरी तो निर्गुणपणानेच स्थित असतो. कारण गुण हे मायिक आहेत आणि आत्मा हा शुद्ध आहे. त्यांचा आणि याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. आत्मा हा व्यापक आहे आणि गुण हे एकदेशीय आहेत. यादृष्टीने पाहिले तरी सुद्धा त्याला बंधन शक्मय नाही. आत्मा हे माणसाचे स्वस्वरूप असून त्याला शरीरातून मुक्त करून त्याचे ईश्वराशी मिलन घडवून आणण्याचे कार्य मनुष्याने देहाचा उपयोग करून करायचे आहे. ईश्वर तर त्रिगुणांच्या पलीकडे आहे म्हणून मनुष्य जर त्रिगुणांच्या पलीकडे पोहोचला तर त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून मुक्त होऊन ईश्वरात विलीन होऊ शकतो. हे सर्व तत्त्वज्ञान भगवंतांनी उद्धवाला समजावून सांगितले. त्यावर त्याने विचारले की असा त्रिगुणांच्या पलीकडे पोचलेला मनुष्य देहात तर असतो पण विदेहीपणे म्हणजे देहात नसल्यासारखा वावरतो याचाच अर्थ ईश्वराने त्याच्या देहाचा ताबा घेतलेला असतो असा निघतो. असा विदेही मनुष्य जगात कसा वावरतो हे जाणून घ्यायची मला अपार उत्सुकता लागली आहे म्हणून ती सर्व माहिती मला द्या. उद्धवाचा प्रश्न ऐकून भगवंतांना अतिशय आनंद झाला. तो अत्यंत भक्तिभावाने आपला उपदेश ग्रहण करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. आता ते त्याच्यावरील प्रेमापोटी मनुष्य विदेही कसा होतो, त्याची वर्तणूक कशी असते इत्यादि माहिती टप्प्याटप्प्याने सविस्तर सांगणार आहेत. भगवंत म्हणाले, जीवामध्ये आणि शिवामध्ये दोष नसतो, तो अंतःकरणामध्ये असतो. तो काढून चित्तच शुद्ध केले म्हणजे बंध आणि मुक्त हा विषयच संपतो. चित्तात हे दोष त्रिगुणांमुळे उत्पन्न होतात आणि अज्ञानी लोक ते आत्म्याच्या माथी मारतात. रज, तम गुण प्रबळ झाले की अज्ञान वाढते. सत्त्वगुणाची वाढ केली की रज, तम गुण झडून जातात. असे झाले की अज्ञान संपुष्टात येते व आत्मविद्या किंवा आत्मज्ञान प्राप्त होते आणि जीवच शिव होऊन राहतो. असे झाले की जीव आणि शिव माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात आणि माझ्या एकाशिवाय दुसरे काही शिल्लकच रहात नाही. तेव्हा ज्याचे चित्त शुद्ध असते तो मला सहजी येऊन मिळतो हे तुझ्या लक्षात आले असेलच. माझे भाषण म्हणजे सत्यातील सत्य आहे असे खात्रीने समज. तू ही खात्री मनात बाळगलीस तरच परमार्थ साधेल. हे माझे वचन ब्रह्मलिखित समज. उद्धवा! माझ्या दृष्टीने वसि÷-वामदेवादि मुनींनी चित्तशुद्धी साधलेली असल्याने मला त्यांच्यात बद्ध किंवा मुक्त असा भेदच दिसत नाही. तेव्हा जे चित्तशुद्धी साधतात त्यांना माझा खरा आत्मानुभव मिळतो. हा आत्मानुभव ज्यांनी घेतलेला आहे ते मुक्त असतात. अशा मुक्तांच्या दृष्टीने पाहिले तर सारी सृष्टी मुक्तच दिसते. त्यांच्या दृष्टीने समोर दिसणारे जग हे एक घटकाभर पडणारे स्वप्नच असते. जाग आली की स्वप्नातील घटना मिथ्या होत्या हे लक्षात येते त्याप्रमाणेच संसार व त्यातील घटना मिथ्या आहेत याची त्यांना खात्री असते. फुटक्मया भांडय़ात पाणी टिकत नाही म्हणून माणसे शोक करतात. उद्धवा मी मूळचाच सच्चिदानंदस्वरूप आहे. मनुष्यामध्ये माझाच अंश असल्याने त्यालाही आनंदात असावे असे वाटत असते पण तो मिथ्या गोष्टी खऱया मानून हाताला लागत नाहीत म्हणून शोक करत बसतो याला काय म्हणूया?
क्रमशः