ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई पोलिसांनी गुरुवारी शहरातील जमावबंदीची मुदत 30 सप्टेंबपर्यंत वाढवली. या आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि टाळेबंदी शिथिल करताना शासनाने मुभा दिलेल्या व्यक्ती, सेवा, व्यवसायांना सूट असेल. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामुळे संपूर्ण टाळेबंदी, संचारबंदी जारी होणार, असा गैरसमज पसरल्याने काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.
मात्र, या आदेशान्वये नवी कोणतीही बंधने लादण्यात आलेली नाहीत, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबिरसिंह, पोलीस दलाच्या प्रवक्त्या एन. अंबिका यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, जमावबंदी असली तरी सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील. मात्र विनाकारण करणार्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- घाबरण्याची गरज नाही : आदित्य ठाकरे
मुंबई पोलिसांच्या या आदेशानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या बाबत एक ट्विट करत घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी 31 ऑगस्टला जारी केलेल्या आदेशाची मुदत 30 सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधीच्या आणि आताच्या आदेशांमध्ये काही बदल नाहीत, नवे र्निबध नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.