प्रतिनिधी / बेळगाव
कट्टणभावी (ता. बेळगाव) येथील एका रहिवाशाचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. शुक्रवारी या गावात मुंबईहून परतलेल्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. एकीकडे गावात कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच मुंबईहून परतलेल्या 50 वषीय इसमाचा मृत्यू झाला आहे. यामुळे शनिवारी सकाळपासूनच परिसरात खळबळ माजली आहे. या इसमाला सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. तेथून घरी पाठविण्यात आले होते. त्याला त्रास जाणवल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे.