ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपवर चौफेर टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान आहे. चीनसमोर पळ काढला हे मुख्यमंत्री म्हणाले, हा सैनिकांचा अपमान आहे, उणे 3 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय सैन्य चीनशी लढले, एक इंचही भूमी चीनला मिळू दिली नाही, चिनी सैनिकांना मागे जावे लागते. मात्र, अशा सैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला.
पुढे ते म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. पूर्ण मुख्यमंत्री बोलले त्यामध्ये महाराष्ट्रापर्यंत येऊच शकले नाही. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिका, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीरसह दक्षिणेतही गेले. पण महाराष्ट्राबद्दल मात्र त्या संपूर्ण भाषणात एक वाक्य देखील ते बोलू शकले नाहीत. खरंतर मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले, पूर्वी ते नवीन होते. आता ते नवीन नाहीत, पण चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण यातले अंतर हे मुख्यमंत्र्यांना अजूनही कळलेले नाही.
राम मंदिराबाबत बोलताना ते म्हणाले,जे खंडणी वसुली करतात, त्यांना राम मंदिरासाठी जनतेने केलेल्या समर्पणाची किंमत काय कळणार? मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी औरंगाबादचं नामांतर करुन दाखवावं, त्यांच्याकडून हे शक्यच नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.