राजकीय सुडबुध्दीने सर्वसामान्यांची छळवणुक होत असल्याचा आमदार संकल्प आमोणकर यांचा आरोप
प्रतिनिधी /वास्को
मुरगाव मतदारसंघात सुडबुध्दीच्या राजकारणातून शासकीय कर्मचाऱयांची बदली करणे आणि घर दुरूस्तीचे कामे रोखणे असे प्रकार सुरू झालेले असून माजी मंत्री व त्यांचे दोन शासकीय कर्मचारी याच कामात व्यस्त आहेत असा आरोप करून मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सरकारने हा प्ंाखकार रोखावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. मुरगावच्या माजीमंत्र्यांना अद्यापही पराभव पचवता आलेला नाही अशीही टीका आमदार आमोणकर यांनी केली आहे.
मुरगाव मतदारसंघ पंधरा वर्षांनंतर भयमुक्त झालेला आहे. आम्ही भयमुक्त झाल्याचे मुरगावची जनताच बोलत आहे. गोव्यातील 39 मतदारसंघांमध्येही निवडणुकीच्या निकालानंतर शांतताच आहे. मात्र, मुरगावमधील काही लोक अद्यापही अशांतता पसरवीत असून त्यांना अद्यापही पराभव पचवता आलेला नाही. आतापर्यंत अनेक निष्पाप युवकांवर नाहक गुन्हे नोंदवण्यात आलेले असून त्यात काही शासकीय सेवकही आहेत.शुल्लक गोष्टींचे राजकारण करण्यात येत आहे.
हल्ली सुडबुध्दीचे राजकारण लोकांच्या घरा दारांकडे तसेच त्यांच्या रोजरोटीकडेही पोहोचलेले आहे. मुरगाव मतदारसंघातील शासकीय कर्मचाऱयांच्या बदल्यांचे सत्र सुरू झालेले आहे. हल्लीच सुरू झालेल्या या बदल्यांपैकी 75 टक्के बदल्या मुरगाव मतदारसंघातील कर्मचाऱयांच्या आहेत. वीज खात्यातील सेवकांचा अधिक भरणा आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर या कर्मचाऱयांना धडा शिकवण्याची भाषा सुरू झालेली आहे. या बदल्यांच्या कारवाईपासून अपंग व्यक्तीचीही सुटका झालेली नाही असे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की सध्या आपल्या विरोधकांकडे सत्ता नाही. तरीही आपले राजकीय बळ वापरून सर्वसामान्य कर्मचाऱयांच्या दूरवर बदल्या केल्या जात आहेत. दूर दूरच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी ज्यांचे अर्धे वेतन खर्च होईल असे हे कर्मचारी असून अद्यापही अनेकांच्या बदल्या होण्याच्या मार्गावर आहेत. याच कामात सध्या माजी मंत्री व त्यांचे दोन शासकीय सेवक व्यस्त असून त्यांना माजी मंत्र्यांनीच नोकरीला लावले होते. गोव्यात सरकार स्थापन होण्यापूर्वीच या गोष्टींना सुरवात झालेली असल्याचे आमदार आमोणकर यांनी म्हटले आहे.
मुरगाव मतदारसंघात बहुतेक घरे सरकारी जमीनीवर आहेत. अनेक कुटुंबे आपापल्या घरांची दुरूस्ती करीत असतात. सध्याही वीस ते पंचवीस कुटुंबांनी आपल्या घरांच्या दुरूस्तीचे कामे सुरू केलेली आहेत. यातील काही निवडक कुटुंबाना लक्ष्य करून त्यांची कामे अडवली जात आहेत. त्यांची कामे अडवण्यासाठी पालिकेचा उपयोग केला जात आहे. पीडीए अधिकारी व पोलीस अधिकारीही घटना दाखल होऊन या कामांमध्ये हस्तक्षेप करीत आहेत. पोलीस बांधकाम करणाऱया मजूरांनाही घेऊन जात आहेत. राजकीय दबाव आणून कुणाला तरी तक्रारी करायला लावणे आणि त्या तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याचे प्रकार घडत आहे. निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी अशा प्रकारे जनतेला छळले जात असून ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर जनतेची अडवणुक करण्यात येत आहे. सरकारने याची दखल घ्यावी. लोकांनी रितसर परवानगी घेऊन आपल्या घरांची दुरूस्ती करण्यास हरकत नसल्याचे आमदार आमोणकर यांनी स्पष्ट केले.
मी यापूर्वी दोन वेळा निवडणुक हरलो होतो. पराभव खिळाडू वृत्तीने स्विकारून विजयासाठी झटत राहिलो होतो. मात्र, माजीमंत्र्यांकडे खिळाडू वृत्ती नाही. त्यांनी अद्याप पराभव स्विकारल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी बोगदय़ावरील भांडण्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्याची प्रत्यक्ष भेटून चौकशी केली. सुडबुध्दीच्या राजकारणामुळे सडय़ावरील निवडक लोकांची जी छळवणुक राजकीय दबावाखाली होत आहे, त्याचीही चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुरगावचे माजी नगराध्यक्ष शरद चोपडेकर यांनीही परावभ न स्विकारण्याची वृत्ती तशीच सुडबुध्दीच्या राजकारणामुळे लोकांच्या चालवलेल्या छळवणुकीसंबंधी माजी मंत्र्यांवर टीका केली. यावेळी मुरगाव काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाईक, ऍड. अविनाश नाईक, सचिन भगत उपस्थित होते.