उदय सावंत/वाळपई :
गेल्या चार दिवसांपासून गाजत असलेल्या सत्तरी तालुक्मयातील गोळवली येथे वाघांच्या मृत्यूप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी वाघांवर विषप्रयोग केल्याची कबुली दिली आहे. गुरुवारी सकाळी संशयितांना घटनास्थळी आणून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न तपास अधिकारी व वनखात्याच्या यंत्रणेकडून करण्यात आला. संशयितांनी मृतावस्थेतील वाघांना कोठे व कसे पुरले याची प्रत्यक्षपणे माहिती दिली. यामुळे मृत वाघांवर विषप्रयोग झाल्याचे सिद्ध झाले असून अवयवांची तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
दरम्यान, गुरुवारी करण्यात आलेल्या चौकशीत या कारस्थानात आणखी एका संशयिताचा समावेश असल्याचे समोर आले आहे. वनखात्याची यंत्रणा संशयिताच्या मागे असून अद्याप तो सापडलेला नाही. गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभाग अधिकाऱयांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व गायब वाघ नखांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुरलेल्या वाघांची पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी वन खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांच्या हजेरीत उत्तरीय तपासणी करून त्यांची विल्हेवाट लावली. तसेच अवयवाचे नमूने गोळा करून ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
संशयितांची कबुली
चार वाघांच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेले संशयित विठो पावणे, मालो पावणे या दोघांनाही गुरुवारी घटनास्थळी चौकशीसाठी आणले होते. गोळावली गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर धनगरवाडा येथे त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी विठोबा पावणे यांनी मृत वाघांवर आपण विषप्रयोग केल्याची कबुली देऊन त्यांना कसे पुरले याची सविस्तर माहिती दिली. तपास अधिकारी नंदकुमार परब यांनी उलट सुलट प्रश्न विचारून त्यांच्याकडून गुन्हय़ाची कबुली घेतली. यामुळे मृत पावलेल्या वाघावर विषप्रयोग केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सकाळी चौथ्या वाघाची उत्तरीय तपासणी करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. यामुळे संपूर्ण भागांमध्ये दुर्गंधी पसरली होती.
श्वानपथकाच्या चांगल्या कामगिरीमुळे संशय बळावला
यादरम्यान एका वरि÷ अधिकाऱयाने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी गोळवली गावातील देवस्थानाची भुगत साजरी करत असतानाच पहिल्या वाघाचा मृत्यू उघडकीस आला त्यावेळी पुढील तपासासाठी श्वानपथकाला पाचारण केले होते. सदर श्वान पथकाने मृत्यू झालेला वाघ व वाघाने मारलेल्या म्हशीकडे जाऊन त्यानंतर संशयिताच्या घरापर्यंत गेला होता. त्याच वेळी या संशयितांबद्दल संशय अधिक बळावला होता. त्यानंतर केलेल्या चौकशीत खात्री पटल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सदर अधिकाऱयाने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
मृत वाघांना पुरण्याचे कारस्थान अंधारात
पहिल्या वाघाचा मृत्यू झाल्याची वार्ता समोर आली त्यावेळी संशयितांनी इतर वाघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शोधार्थ दोन वाघ त्यांच्या हाती लागले. त्यांना अंधारातच पुरण्याचा प्रयत्न या संशयितांनी केले, अशी माहिती खुद्द एका संशयिताने गुरुवारी तपास अधिकाऱयांसमोर दिली. पैकी एक वाघीण हिचा मृतदेह पाणी असलेल्या जागेत पुरला होता व दुसऱया नर बछडय़ाचा मृतदेह तेथून पाच मीटर अंतरावर उंच ठिकाणी पुरण्यात आला होता.
विषप्रयोग कधी केला
या वाघांकडून संशयितांच्या म्हशीची शिकार दि. 30 डिसेंबर 2019 रोजी झाली होती. मृत म्हशीचे मांस खाण्यासाठी दुसऱयादिवशी नक्कीच वाघांचा समुदाय येणार याची खात्री संशयितांना होती. त्यामुळे त्यांनी रेटॉल नामक विष मृतावस्थेतील म्हशीच्या मांसावर टाकले होते. दुसऱया दिवशी पुन्हा या वाघांनी सदर मांस खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची कबुली तपास अधिकारी नंदकुमार परब यांच्यासमोर संशयिताने दिली.
अनेक जनावरांचा बळी
पहिल्या वाघाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली त्यावेळी त्यांच्या समूहात राहणाऱया इतर वाघांचा मृत्यू होऊ शकतो, याचा संशय घेऊन वन खात्यातर्फे कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. या कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रानडुक्कर, साळिंदर यांचाही मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. विषाचा प्रयोग केलेल्या म्हशीच्या मासावर रानडुक्कर व साळिंदर यांनीही डल्ला मारल्याने त्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी डुक्कर मरून पडल्याचेही वृत्त वन कर्मचाऱयांकडून समजते.