बेळगाव / प्रतिनिधी :
भारतीय राज्य घटनेचा अर्थ समजुन घेतल्यास आईला समजून घेतल्यासारखे आहे. आईने घालून दिलेल्या मार्गावरच पुढे जावे, खऱया अर्थाने भारत निर्माण करण्याचे काम भारतीय राज्य घटनेने केले आहे. असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नागमोहन दास यांनी सांगिलते.
गुरूवारी जिल्हा पंचायत सभागृहात भारतीय राज्य घटना वाचन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन करून निवृत्त न्यायाधीश नागमोहन दास बोलत होते. जिल्हा कायदा सेवा प्राधिकर बेळगाव, जिल्हा पंचायत, महिला आणि बालकल्याण खाते, वकील संघटना आणि समुदाय कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास आयोगाच्या वतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी भारतीय राज्य घटनेबाबत उपयुक्त माहिती दिली. गेल्या 70 वर्षापासून आपणास नवीन शिक्षण पद्धती अंमलात आणण्यास शक्मय झाले नाही. नवीन अभ्यासक्रम आल्यास आपली राज्यघटना समजून घेणे शक्मय होणार आहे. एकेकाळी राजकीय अधिकार राजा महाराजांच्या हाती होती. त्यानंतर हे अधिकार लोकशाही व्यवस्थेत समावि÷ झाले. लोकशाही व्यवस्थेत शासकीय, न्यायालयीन आणि कार्यालयीन नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचे निवृत्त न्यायमूर्ती नागमोहनदास यांनी सांगितले.
तत्पूर्वी बोलताना जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. जे. सतिशसिंग यांनी देशाच्या प्रत्येक नागरिकास भारतीय राज्य घटना समजणे आवश्यक असल्याचे सांगितले. भारतीय राज्य घटनेचा अर्थ प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. देशात आंदोलने झाली तर सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्यात सर्वांचा पुढाकार असतो. यामुळे आपल्या घरातूनच संस्कृती शिकविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने भारतीय राज्य घटनेचा अभ्यास करणे आणि समजून घेणे कर्तव्य आहे. भारतीय राज्य घटना तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी प्रदीर्घ काळ अध्ययन केले मात्र इतकी वर्षे लोटली तरी आपल्या लोकांना भारतीय राज्य घटनेचा अर्थ समजून घेणे शक्मय झाले नाही. अशी खंत न्यायाधीश आर. जे. सतिशसिंग यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी यांनीही विचार मांडले. भारतीय राज्य घटनेचा अभ्यास नसल्याने बऱयाच चुका होत आहेत. भारतीय राज्य घटनेचा अभ्यास आजही असंख्य लोकांना नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या भविष्यासाठी राज्य घटनेची रचना करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले. व्यासपिठावर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. उपस्थित होते. भारतीय राज्य घटना काही जणांपुरतीच मर्यादीत झाली असल्याचा चुकीचा संदेश झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आणि बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, राज्य घटना वाचन अभियान समितीचे सदस्य के. एच. पाटील, समाजकल्याण खात्याच्या सहसंचालीका उमा सालिगौडर, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्यासह अन्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.