कोकणात रायगड, सिंधुदूर्गातच मेडिकल कॉलेज
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, नाशिक आणि सातारा, अमरावती व परभणी येथे नवीन शासकीय महाविद्यालये होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून केली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ात मेडिकल कॉलेज वर्षाभरात सुरु करण्याचा केवळ ‘गाजावाजा’च होता हे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमधून मेडिकल कॉलेजसाठी रत्नागिरीला ठेंगाच दाखविण्यात आल्याने यापूर्वी झालेल्या घेषणा, आश्वासने यांसमोरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
रत्नागिरीत वर्षभरात मेडिकल कॉलेजचे काम सुरु होणार असे छातीठोकपणे सांगत कॉलेजच्या निर्मितीसाठी प्रक्रिया गतीमान केल्याच्या घोषणा काही महिन्यांपूर्वी सुरु होत्या. यासाठी समिताची स्थापना, जागेची निश्चिती, पालकमंत्री अनिल परब यांच्यासह मंत्री उदय सामंत याच्याकडून जागेची पाहणी एवढेच नव्हे तर त्यासाठी विशेष कार्यालयही स्थापन करण्यात आले. अर्थसंकल्पात या उपक्रमाला वाटाण्याच्या अक्षता लागल्या असल्या तरी हे कार्यालय मात्र सुरु आहे. आता या साऱयाच हालचाली आणि घोषणा संशयाच्या भोवऱयात सापडल्या आहेत. यामध्ये नेमकी फसवणूक कोणाची झाली याबाबत विविध चर्चा रंगु लागल्या आहेत. लाकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल केली, लोकप्रतिनिधींनाच वरिष्ठ नेत्यांनी टोपी घातली की दोघांनी मिळून मतदारांना ‘मामा’ बनवले हे लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मागील काही महिन्यात यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ, वारेमाप खर्च याबाबतही प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात मेडिकल कॉलेजसाठी व प्रवेशासाठी एक कार्यालय काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते व ते अजुनही कार्यान्वित आहे. याठिकाणी प्रत्यक्षात कोणीही येऊन बसत नाही. येथष जर कॉलेज होणारच नसेल तर या कार्यालयाचे अस्तित्व नेमक्या कशासाठी असा प्रश्न रत्नागिरीकरांना पडला आहे. रत्नागिरीकरांना कॉलेज सुरु करण्याचे आश्वासनही यामुळे हवेत विरले असून सिंधुदूर्ग जिल्हय़ात मात्र यासाठी निधीची तरतुदही करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच या कॉलेजला मंजूरी मिळाली होती