आंदोलकांच्या धसक्याने मोठा पोलीस बंदोबस्त : कोणत्याही अडथळय़ाविना सायंकाळपर्यंत कामा
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली याठिकाणी उभारण्यात येणाऱया आयआयटी प्रकल्पाच्या सीमांकन कार्याला काल बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. या कामाला विरोध करण्यासाठी जमा झालेल्या आंदोलनकर्त्यांना शांत करण्यात सत्तरी तालुक्मयाच्या संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर व वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यशस्वी झाल्यामुळे या कामाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही.
सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सातार्डेकर यांनी चांगल्या प्रकारची भूमिका निभावल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळाले. सकाळी दहा वाजता सुरू झालेले सीमांकन कार्य संध्याकाळपर्यंत पोलीस बंदोबस्तात सुरू होते.
अगोदर आमच्या मागण्या पूर्ण करा : आंदोलक
या कामाला विरोध होण्याची शक्मयता गृहीत धरुन मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुरमुरणे धनगरवाडा येथून या कामाला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती मिळताच जल्मी देवस्थानात जमून असलेल्या विरोधकांनी घटनास्थळी धाव घेऊन याला विरोध दर्शविला. सर्वप्रथम आमच्या मागण्या व समस्यांसंदर्भात सरकारने विचारपूर्वक पावले उचलावीत व नंतर कामाला सुरूवात करावी अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्त्यांनी संयुक्त मामलेदारांसमोर लावून धरली.
…तोपर्यंत कामाला सुरुवात करु नये
पंचायतीने अजूनपर्यंत खास ग्रामसभा बोलावण्यात आलेली नाही. त्यामुळे आमच्या मागण्यावर सरकार हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामाला सुरुवात करू नये अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. मात्र त्याला संयुक्त मामलेदार व पोलीस निरीक्षकांनी विरोध दर्शविला.
आंदोलनकर्त्यांनी विरोध केल्यानंतर यासंदर्भात आंदोलनकर्त्याना शांत करण्याचा प्रयत्न संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर यांनी केला. सदर काम जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार करण्यात येत असून त्याला विरोध केल्यास आपणाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नोंद करण्यात येणार असून त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सदर कणखर भूमिकेमुळे आंदोलनकर्ते थंड पडले. यावेळी त्यांनी संयुक्त मामलेदारांना निवेदन देऊन सर्वे क्रमांक 67/1 या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात असलेल्या लागवडी पूर्णपणे नष्ट होणार असून यासंदर्भात गांभीर्याने चौकशी करून न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावरून सर्व आंदोलक घरी परतले. यामुळे अवघ्याच पोलीस बंदोबस्तात सिमांकन करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.