बेंगळूर/प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत कृषी विधेयक मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. खरगे यांनी देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी दिलेली घोषणा याऐवजी मोदींना ‘मर जवान, मर किसान’ वर विश्वास आहे असे म्हंटले.
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीने कर्नाटक कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खर्गे यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढविला. घाईघाईने केलेली नोटाबंदी असो किंवा लागू केलेली जीएसटी किंवा मंजूर केलेली कृषी विधेयके ही मोदींची धोरणे भविष्यात ‘मोदी का विश्वास ‘मारो जवान, मारो किसान’ असे धोरण असू शकते असा आरोप त्यांनी केला.
खरगे यांनी मोदींनी देशाचा इतिहास वाचला पाहिजे. किमान त्यांनी चंपारण्य सत्याग्रह वाचलाच पाहिजे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या या सत्याग्रहात शेतकरी सामील झाले होते. या सत्याग्रहाने संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचा चेहरामोहरा बदलला.
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवरही निशाणा साधला आणि म्हणाले की देशात दलितांना त्यांचे राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे, परंतु ते सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यापासून दूर आहेत. उत्तर प्रदेशात दलितांशी कसे वर्तन केले जात आहे. हे जनता पहात आहे.