उदय सावंत/ वाळपई
सत्तरी तालुक्मयात म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात काल रविवारी सकाळी गोळावली गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वराची गुंफा या देवस्थानच्या परिसरात चार वषीय पट्टेरी वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याचा मृत्यू जवळपास आठ दिवसापूर्वी झाल्यामुळे त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. त्याच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.
गोळावली गावातील सिद्धेश्वर देवस्थानची पारंपरिक भुगत उत्सव वर्षातून दोन वेळा होत असतो. अशाच प्रकारचा एक धार्मिक व पारंपारिक कार्यक्रम काल रविवारी आयोजित करण्यात आला होता. यामुळे गावातील भाविक, नागरिक त्याचप्रमाणे इतर भागातील भाविक मोठय़ा संख्येने सदर परिसरात पारंपारिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी गेले होते.
साफसफाई करताना मृतदेह आढळला
काल परिसराची साफसफाई करत असतानाच सदर पट्टेरी वाघाचा मृतदेह आढळला. वाघ कुजलेल्या अवस्थेत असून त्यावर अळय़ा निर्माण झालेल्या आहेत. यासंदर्भाची वार्ता सदर परिसरामध्ये पसरताच नागरिक व भाविकांनी हा प्रकार पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. याबाबतची माहिती वनखात्याच्या संबंधित अधिकारी व म्हादई अभयारण्याच्या अधिकाऱयांना देण्यात आल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली.
वनखात्याची यंत्रणा घटनास्थळी दाखल
यासंदर्भाची माहिती वनखात्याच्या यंत्रणेला देण्यात आल्यानंतर वनखात्याचे डीसीएफ विकास देसाई, एसीएफ नंदकुमार परब, म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रातील अधिकारी विलास गावस व इतर कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन या पाहणी केली. पंचनामा करण्यात आल्यानंतर शवचिकित्सा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधला असता ते इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत ते घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. यामुळे सदर मृत वाघाचे शवविच्छेदन सोमवारी सकाळी करण्यात येईल, अशी माहिती विकास देसाई यांनी दिली.
मृत वाघ चार वर्षे वयाचा
वाघाच्या निधनाची बातमी स्थानिक नागरिकांकडून वनखात्याला मिळाल्यानंतर संबंधित खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व यासंदर्भात पंचनामा करण्यात आलेला आहे. या वाघाच्या मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. मृतावस्थेत सापडलेला पट्टेरी वाघ चार वर्षाचा असून तो नर असल्याचे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाघाच्या मृत्यूच्या कारणाबाबत अनेक तर्कवितर्क
या वाघाच्या मृत्यूसंदर्भात अनेक प्रकारचे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला त्याठिकाणी नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र आहेत. त्याच परिसरामध्ये रक्ताचे डाग आढळून आले असून त्यांनी मृत्यूपूर्वी रानटी जनावरांची शिकार करण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. जनावरांची शिकार करताना तो या हल्ल्यात कदाचित जखमी होऊन मरण पावण्याची शक्मयताही वर्तविली जात आहे. काही नागरिकांच्या मतानुसार त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. वनाधिकारी विकास देसाई यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार विषबाधेचा होऊ शकतो तरीसुद्धा निश्चित कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
वनखात्याच्या कारभारावर प्रकाश टाकणारी घटना : राजेंद्र केरकर
म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात पाच पट्टेरी वाघांचे वास्तव्य असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. यामुळे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. मात्र यासंदर्भात वनखात्याची यंत्रणा पूर्णपणे कमी पडल्याची खंत पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे. केरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन एकूण यासंदर्भाची माहिती जाणून घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाघाच्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. कुजलेल्या अवस्थेत मिळालेल्या वाघाचा मृत्यू कदाचित आठ दिवसापूर्वी झाला असू शकतो. त्यासंदर्भात विषबाधा होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नसल्याचे यावेळी ते म्हणाले. दोन वर्षांपूर्वी या अभयारण्यात पाच वाघ असल्याचे सिद्ध झालेले आहे. यामुळे या परिक्षेत्रात सरकारने व्याघ्र संवर्धनासाठी पथक नियुक्त करण्याची गरज होती. साधनसामुग्री व मनुष्यबळाची कमतरता यामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचे राजेंद्र केरकर यांनी स्पष्ट केले आहे. या पट्टेरी वाघाच्या मृत्यूमुळे वनखात्याच्या कारभारावर प्रकाश टाकणारी ही घटना असल्याचे केरकर यांचे म्हणणे आहे.
दरम्यान काल सिद्धेश्वराचा पारंपरिक उत्सव होता म्हणून वाघाचा मृत्यू उजेडात आला झाला. अन्यथा या संदर्भाची कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नसती.
यापूर्वी गुरांची शिकार झाली होती.
गोळावली गावातील नागरिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी एक गाय व बैल यांची शिकार पट्टेरी वाघाकडून झाल्याचे उघड झाले होते. यामुळे अभयारण्याच्या व्यवस्थापनाकडून यासंदर्भातील गंभीर दखल घेऊन उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र त्याकडे लक्ष न दिल्यामुळे नागरिकही पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत. या संदर्भात नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना आज पारंपरिक भुगत साजरी करण्यासाठी जमलेल्या नागरिकांना यासंदर्भात प्रकार उघडकीस आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे विचार न करता या संदर्भाची माहिती पूर्णपणे वनखात्याला देण्यात आल्यानंतर त्या संदर्भातील पुढील प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे.