बेंगळूर/प्रतिनिधी
काँग्रेसचे माजी मंत्री एम.बी. पाटील यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली आणि विजापूर येथील इंदी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाटबंधारे प्रकल्प होण्यासाठी वित्त विभागाची परवानगी मागितली. परंतु पाटील-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत.
माजी जलसंपदा मंत्री पाटील यांनी येडीयुरप्पा यांना सांगितले की, वित्त विभागाने तिडगुंडी जलवाहिनीच्या माध्यमातून कृष्णा नदीमधून १६ लघु पाटबंधारे टाकण्यासाठी प्रकल्प ठेवला होता. दरम्यान, येडियुरप्पा यांना भेटल्यानंतर त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “त्यांनी आपली मागणी अनौपचारिकरित्या मान्य केले आहे.”
पाटील यांच्या म्हणण्यानुसार कृष्णा भाग्य जाल निगम लिमिटेडने ऑक्टोबर २०२० मध्ये अंदाजे १४० कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर, साथीच्या आजाराने होणारी आर्थिक परिस्थिती पाहता वित्त विभागाने हा प्रकल्प पुढे ढकलला. “या प्रकल्पातून इंदी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील नारिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मदत होईल,” असे पाटील यांनी येडीयुरप्पा यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले. ते म्हणाले की, १६ टँक भरणे बहु-ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे स्रोत बनेल आणि जवळील खेड्यांमध्ये भूजल पातळी सुधारेल. दरम्यान, पाटील- येडियुरप्पा यांच्या भेटीनंतर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. पाटील उत्तर कर्नाटकातील असून ते लिंगायत समुदायाचे प्रमुख नेते मानले जातात.