73 वर्षांपासून लोक घेत आहेत लाभ
भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वेजाळे आहे. भारतात रेल्वेस्थानकांची एकूण संख्या 8 हजारांच्या समीप आहे. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि आरामदायी असल्याने लोक या पर्यायाची निवड करण्यास प्राधान्य देतात. रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागते. परंतु भारतात एक अशी रेल्वे आहे, ज्यात लोक विनातिकीट प्रवास करतात.
भाखडा-नागल धरण पाहणाऱयांसाठी हे रेल्वे चालविली जाते. हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर नागल आणि भाखडादरम्यान ही रेल्वेसेवा सुरू आहे. भाखडा-नागल धरण पाहण्यासाठी जाणाऱया लोकांना या रेल्वेतून मोफत प्रवास करता येतो. यातील डबे लाकडाद्वारे तयार करण्यात आले असून यात टीटी नसतो. ही रेल्वे डिझेलद्वारे संचालित होते आणि दरदिनी 50 लिटर इंधनाचा वापर होत असतो.
भारताच्या या विशेष रेल्वेत पूर्वी 10 डबे जोडलेले असायचे, परंतु आता यात केवळ 3 डबे जोडलेले असतात. यातील एक डबा पर्यटकांसाठी एक महिलांसाठी राखीव असतो. या रेल्वेत लोकांना मोफत प्रवास करविण्याचा एक उद्देश आहे. भाखडा-नागल धरण लोकांना पाहता यावे म्हणून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.
या रेल्वेचे संचालन भाखडा व्यास व्यवस्थापन मंडळाकडून केले जाते. या रेल्वेसेवेची सुरुवात सुमारे 73 वर्षांपूर्वी 1949 मध्ये करण्यात आली होती. या रेल्वेमधून 25 गावांमधील सुमारे 300 लोक दररोज मोफत प्रवास करतात. शाळा-महाविद्यालयात शिकणाऱया विद्यार्थ्यांना या रेल्वेचा सर्वाधिक लाभ होतो. या रेल्वेद्वारे भाखडाच्या आसपासच्या गावांमधील लोक प्रवास करतात. जर तुम्हाला भाखडा-नांगल धरण पहायचे असल्यास या रेल्वेतून मोफत प्रवास करता येतो.