प्रतिनिधी/ सातारा
युक्रेन आणि रशियांचे युद्ध सुरु आहे. त्या युद्धाच्या ठिकाणी युक्रेन येथे सातारा जिह्यातील 19जण अडकले होते. त्यापैकी 5 जणांची भारत सरकारने सुखरुप सुटका केली असून पाच जण सातारा येथे पोहचले असून त्या पाच जणांची गोपनियता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून राखण्यात आलेली आहे. प्रशासनाकडून पाच जण साताऱयात पोहचल्याचे सांगण्यात आले.
जिह्यात युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले 19 जण अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यापैकी केवळ पाच जणांना आणण्यात यश आले असून ते पाच जण आज दुपारी साताऱयात पोहचले. साताऱयात त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचताच त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद झाला. मात्र, या पाच जणांची नावे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्हा माहिती कार्यालयाला दिलेली नसल्याने त्याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही.