वार्ताहर /रायबाग :
देशाचे रक्षण करणारे सैनिक, अन्न देणारे शेतकरी व ज्ञान देणारे शिक्षक हे तिन्ही देशाचे अविभाज्य अंग आहेत. हे तिन्ही त्याग, परिश्रम, कर्तव्य व निष्ठेने काम करत असतात. राजू कांबळे यांना अगदी कमी वयातच देशसेवा बजावताना वीरमरण आले. आजच्या युवापिढीने देश रक्षणासाठी सैन्यदलात भरती व्हावे, असे विचार जि. पं. सदस्य प्रणय पाटील यांनी व्यक्त केले.
येथील साईनगरात स्वातंत्र्य सेनानी व्ही. एल. पाटील (आबाजी) फाऊंडेशन व कर्नाटक दलित संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा वीरजवान राजू कांबळे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन जि. पं. सदस्य प्रणय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत बोलत होते.
कार्यक्रमास तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, टी. एस. पटगुंदी, ग्रा. पं. अध्यक्ष महादेव कोकाटे, ता. पं. सदस्या सिद्धव्वा पुजारी, वीर जवान राजू कांबळे यांच्या मातोश्री मल्लव्वा कांबळे, वसंत कांबळे, अशोक अंगडी, ऍड. पी. एन. पाटील, आण्णासाब हिडकल, संजीव जाधव, निंगाप्पा पुजारी, सिद्धू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवानंद हुलगबाळ यांनी आभार मानले.