प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानीही निदर्शने
चंद्रकांत पाटील पूजाअर्चा मध्ये मग्न – कल्याणी माणगावे
कोल्हापूर / प्रतिनिधी
पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सहा महिने झालेत या पॅकेजची एक दमडीही मिळालेली नाही.मोदी सरकारने या पॅकेजचे काय केले ? याचा जाब जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर व धनंजय महाडीक यांच्या कार्यालयासमोर मुक आंदोलन करून विचारला . यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आम्ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
कोरोना महामारीच्या काळात देशभरातील उद्योग धंदे बंद पडले, शेकडो तरुणांचा रोजगार गेला, जनता वैफल्यग्रस्त बनली. रोजी – रोटीचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत जनतेतून केंद्राकडे मदतीची मागणी होवू लागली. जनतेचा वाढता रोष लक्षात घेवून आत्मनिर्भर या गोंडस नावाखाली स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहिर केले. पाच महिने झाले अद्याप मोदी सरकारच्या पॅकेजमधील एक दमडी सुध्दा जनतेच्या हाती पडलेली नाही. या २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज नेमकं कुठे गेले असा प्रश्न आता सर्व सामान्य जनतेला पडू लागला आहे. हे पॅकेज नेमकं जनतेपर्यंत पोहचल की नाही याची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहानीशा केली. परंतु ते पोहचले नसल्याचे दिसून आले आहे. ऐवढा मोठा निधी नेमका गेला कुठे,निधी कधी मिळणार? यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवास्थानासमोर, कार्यालयासमोर २० लाख कोटी गेले कुठे असे फलक झळकावत मुकं आंदोलन केले. कोल्हापुरातही इंद्रजित साळोखे, कल्याणी माणगावे, ऋषीकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानासामोर मुक आंदोलन केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी निदर्शनास सामोरे जाऊन आंदोनल कर्त्याच्या भावना समजावून घेण्यापेक्षा घरी देवघरात पूजा करण्यात मग्न राहिले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून मोदी सरकाच्या २० लाख कोटी रुपयाचे काय केले? याचे उत्तर कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. परंतु याचं उत्तर कार्यकर्त्यांना मिळाल नसल्याने.इथून पुढे भाजपाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारुन आमची मागणी केंद्र सरकारकडे पोहचणार असल्याचे युवक कॉग्रेसच्या कल्याणी माणगावे यांनी सांगितले. या मुक आंदोलनात जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष बयाजी शेळके दिपक थोरात, उदय पोवार, विनायक पाटील, योगेश कांबळे, लखन भोगम, संजय सरदेसाई, संभाजी पाटील, आनंदा करपे, सनी सावंत, अनिल कांबळे सहभागी झाले होते.
दरम्यान मागील माजी खासदार आणि सध्या भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले धनंजय महाडिक यांच्या कावळा नाका येथील कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारत पॅकेजचा फलक उभारला होता. मोदींचे हे पॅकेज कुठे आहे ? असा आक्षेप कार्यकर्त्यांनी नोंदवल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी उभारलेला मोदीचा आत्मनिर्भर भारत पॅकेजचा हा फलक आंदोलकांच्या हातातून काढून पोलीसानी घेतले व आंदोलकांना ताब्यात घेवुन नंतर सोडून देण्यात आले.