वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात वेस्ट इंडीजमध्ये होणाऱया 19 वर्षांखालील वयोगटाच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली असून दिल्लीचा फलंदाज यश धुलकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
14 जानेवारी ते 5 फेबुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया भारताचा दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, युगांडा यांच्यासह ब गटात समावेश करण्यात आला आहे. यश धुलची कर्णधारपदी नियुक्ती ही अपेक्षितच होती. कारण आशिया चषक स्पर्धेसाठीही त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा 23 डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होत आहे. आंध्रच्या एसके रशीदकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेची ही चौदावी आवृत्ती असून भारताने 2000, 2008, 2012, 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. 2016 मध्ये मात्र उपविजेतेपद मिळाले होते.
भारतीय युवा संघ (यू-19) ः यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगकृश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मनव पारख, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गर्व सांगवान. राखीव खेळाडू ः रिशित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंग राठोड.