वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट संघातील खेळाडू दिव्यांश जोशी अनफिट ठरला असल्याने त्याच्या जागी यू-19 विश्वचषकासाठी महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरची निवड करण्यात आली आहे.
द.आफ्रिकेत झालेल्या द्विदेशीय वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यावेळी दिव्यांशला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना पडल्यानंतर त्याच्या उजव्या खांद्याला ही दुखापत झाली होती. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने त्याच्या जागी आता महाराष्ट्राच्या सिद्धेशला संधी दिली आहे.
भारताचा यू-19 विश्वचषक संघ : प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, धुव चंद जुरेल (उपकर्णधार-यष्टिरक्षक), शाश्वत रावत, सिद्धेश वीर, शुभांग हेगडे, रवि बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.