प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण गेले काही दिवस असल्याने जिल्हय़ाच्या एकूण वातावरणात कमालीचा चढ-उतार पाहायला मिळत होता. पुणे वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार 14 मार्च रोजी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान 39 अंश सेल्सीअस रत्नागिरीचे नोंदवण्यात आले. गेले काही दिवस जिल्हय़ाचे तापमान कमालीचे वाढलेले आहे. या लहरी वातावरणाचा फटका जिल्हय़ाचे मुख्य पीक असलेल्या आंब्यावर होत आहे.
पुणे वेधशाळेनुसार 15, 16 मार्चला कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या आंबा बागायतदारांची कामे सुरु आहेत. तसेच निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने शहराच्या मुख्य बाजारात गर्दी होताना दिसते आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. नागरिकांकडून नारळपाणी, ज्युस सेंटर येथे वाढत्या उकाडय़ापासून ]िदलासा मिळण्यासाठी गर्दी होताना दिसते आहे.
नागरिकांना सूचना
नागरिकांनी जास्तीतजास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल, छत्रीr टोपी, बुट यांचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी उन्हापासून बचाव होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि शरीरातील पाण्याच्या पातळीचे संतुलन राखण्यासाठी तरल पदार्थांचा वापर करावा, अशा मार्गदर्शक सूचना शासनाकडून दिल्याचे परिपत्रक जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढण्यात आले आहे.