प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात सध्या सेवा बजावणाऱया 4 पोलीस अधिकाऱयांना केंद्र सरकारने सेवा पदकाने सन्मानित केले आहे. रत्नागिरी शहर डीवायएसपी गणेश इंगळे, चिपळूण डीवायएसपी नवनाथ ढवळे, रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश कदम, मंडणगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत वराळे अशा 4 अधिकाऱयांना हे पदक प्राप्त झाले आहे.
गडचिरोली, गोंदियासारख्या अत्यंत संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात 2 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावणाऱया पोलीस अधिकाऱयांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने पदक देऊन गौरव केला. गडचिरोली, गोंदियासारख्या अत्यंत कठीण आणि नक्षलग्रस्त भागात सेवा बजावताना अनेक सामाजिक उपक्रम राबवून तेथील नक्षलवाद्यांचे मत परिवर्तन करण्याचे महत्वाचे कामही अधिकाऱयांनी यापूर्वी केले आहे. जिह्यात काम करतानाही या अधिकाऱयांनी चमकदार कामगिरी केली. जिल्हय़ातील गुन्हय़ांचा छडा लावण्यांबरोबर अनेक सामाजिक उपक्रमातही या सर्व अधिकाऱयांनी मोठा सहभाग नोंदवला आहे. या सगळय़ा बाबींची दखल घेवून यापूर्वी पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. सध्या रत्नागिरी जिह्यात सेवा बजावणाऱया वरील 4 अधिकाऱयांना केंद्र सरकारचे हे मानाचे पदक मिळाल्याने त्यांच्यावर वरिष्ठांकडून तसेच रत्नागिरीतील नागरिकांमधून अभिनंदन केले जात आहे.