प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हयात संततधार सुरुच असून गेल्या 24 तासात 9 पैकी 7 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्हयात आज सकाळपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस झालेला आहे. आज सकाळी 08 वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 87.68 मिमी. पाऊसाची नोंद झाली.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी गेल्या 3 दिवसात जिल्हयात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. जिल्हयातील पावसाची वार्षिक सरासरी 3394.9 मिलीमीटर आहे. आजपर्यंत 1603.36 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
यंदाच्या पावसाळयात 1 जुन पासून सर्वाधिक 2063.13 मिमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात नोंदला गेला. सर्वात कमी 1101.17 मिमी पाऊस मंडणगड तालुक्यात नोंदला गेला आहे.
तालुकानिहाय आजवरचा पाऊस असा मंडणगड 1101.17 मिमी, दापोली 1225.41, खेड 1308.18, गुहागर 1824.75, चिपळूण 1453.51, संगमेश्वर 1949.82, रत्नागिरी 2063.13, लांजा 1714.72 आणि राजापूर 1789.58 मिमी.
24 तासात सरासरी 87.68 मिमी पाऊस
मंडणगड 92.30 मिमी, दापोली 45.00 मिमी, खेड 54.80 मिमी, गुहागर 94.70 मिमी, चिपळूण 96.40 मिमी, संगमेश्वर 132.70 मिमी, रत्नागिरी 112.50 मिमी, राजापूर 82.90 मिमी, लांजा 77.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.